आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराताशी दीडशे किलोमीटर वेगासाठी डिझाइन करण्यात आलेला समृद्ध महामार्गावर प्रवाशांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यासाठी “झिरो फन्टॅलिटी’ तत्त्वाच्या आधारे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र उपाययोजना केल्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा दावा आहे. त्याच निकषांनुसार या प्रकल्पावर नेमण्यात आलेल्या कन्सल्टंट कंपन्या आणि ठेकेदार कंपन्यांकडून काम करवून घेतले जात आहे. प्रकल्पाच्या हस्तांतरणानंतर पुढील चार वर्षे या महामार्गाच्या देखभालीची जबाबदारीही याच ठेकेदार कंपन्यांवर असणार आहे.
गोदावरी नदीवर पालखीचे तर वर्धा नदीवर चरख्याचे प्रतीक
बांधकामाचा पहिला टप्पा पूर्णत्वास जात असताना, “समृद्धी’च्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावांचा विचार सुरू झाला आहे. यामध्ये त्या त्या टप्प्यावरील महतींचा विचार करून डिझाइन्स तयार केली जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून हा महामार्ग जाताना गोदावरी नदीवरील पुलावर शिर्डीच्या साई मंदिराच्या किंवा “पालखी’च्या नक्षीची कमान केली जाणार आहे. वर्धा नदीवरील पुलावर सेवाग्रामची महती सांगणाऱ्या “चरख्या’ची अायकाॅनिक स्ट्रक्चर्स बांधली जात अाहेत.
वेगासोबतच सुरक्षेचाही विचार
समृद्धी महामार्गावरून कोणत्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी कोणता इंटरचेंज वापराल?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.