आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्धा जिल्ह्यात पाच दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असता, त्यात पुन्हा भर घातली जात आहे. कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या बघताच प्रशासनाकडून पुन्हा एकदा पाच दिवस वर्धा जिल्हा लॉक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा बंद राहणार तर घरपोच सेवा या कालावधीत सुरु राहणार आहेत.लॉकडाऊन नियय मोडल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दिनांक ८ मे ते १३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. दररोज कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढतीवर आहेत, तर मृत्यूच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.पाच दिवसांच्या या लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.
तरी सुद्धा नागरिक रस्त्यावर फिरतांना दिसत असल्यामुळे दिनांक १३ मे रोजी सकाळी ७ ते दिनांक १८ मे सकाळी ७ वाजेपर्यंत पुन्हा एकदा पाच दिवसांकरिता लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. या लावण्यात लॉकडाऊन मध्ये सर्व बँक, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, पेट्रोल पंप, भाजी बाजार,हॉटेल व किराणा दुकाना बंद राहणार आहेत.
घरपोच सेवा सुरु राहणार मात्र,आरटीपीसीआर चाचणी करुन घेण्यात यावी.अहवाल निगेटिव्ह असेल तरच घरपोच सेवा पुरविण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. खाजगी रुग्णालय सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे, तर रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या रुग्णवाहिका व खाजगी वाहनांना पेट्रोल दिले जाणार आहेत.कृषी क्षेत्रातील शेयीपयोगी साहित्य व बी- बियाणे घरपोच देण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढले आहेत. कोरोना आजाराची साखळीत खंड पडावा यासाठी अनेक प्रयत्न केले जात असून,जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतीचे प्रमाणात जास्त प्रमाणात आहेत.जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना विनाकारण घरा बाहेर पडू नका असे सातत्याने सांगितले जात असूनही,नागरिक बेजबाबदार पणे रस्त्यावर फिरताना दिसत असल्यामुळे जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
घरपोच सुविधा मिळणार तो आदेश कागदोपत्री
कडक लॉकडाऊन मध्ये घरपोच सुविधा मिळणार असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. व्यावसायिकांनी ग्राहकांना घरपोच सुविधा द्यावी याकरिता दुकाने उघडले तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. स्वतःच आदेश काढतात आणि दुसऱ्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात सुरु असून,तो आदेश कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे.
अत्यावश्यक सेवेतील अनेक दुकानांचे भ्रमणध्वनी नॉटरीचेबल
ग्राहकांना घरपोच सुविधा मिळावी यासाठी भ्रमण ध्वनीवरुन संपर्क साधला असता,गॅस एजन्सी व दुकानांचे नॉटरीचेबल असल्यामुळे ग्राहक स्वतः दुकानात किंवा गॅस एजन्सी मध्ये जाताच त्या नागरिकांना दंड देण्याचा प्रकार शहरात दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.