आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने आपल्या नवीन पीककडे जात आहे. येथील बिकट परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने विविध जिल्ह्यात 30 तज्ञ वैद्यकीय पथके पाठवली आहेत. कोरोना तज्ञांची ही टीम राज्यातील कोविडशी झुंज देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोना नियंत्रणासाठी रणनीती आखण्यास मदत करेल. दरम्यान, राज्यात लसीचे डोस संपण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार आता फक्त एक ते दोन दिवस शिल्लक आहेत.
गेल्या 24 तासांत आतापर्यंत 59,907 प्रकरणे समोर आली आहेत. यासह, एकूण प्रकरणे वाढून 31,73,261 वर आली आहेत. या काळात राज्यात कोरोना संक्रमितांच्या 322 मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्रात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या 56,652 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात संपणार आहे लसीचा स्टॉक
प्रधान सचिव (आरोग्य) प्रदीप व्यास म्हणाले की, बुधवारी सकाळपर्यंत राज्यात सुमारे 14 लाख व्हॅक्सीन डोस होते. अनेक जिल्ह्यांमध्ये आज किंवा उद्यापर्यंत हा साठा संपेल. केंद्राला याची जाणीव आहे आणि आम्ही त्यांना लेखी कळवले आहे. ते म्हणाले की, लसांचे वेळापत्रक व उपलब्धता असल्यास महाराष्ट्राला दररोज पाच लाख शॉट्स सहज देता येतील. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, आठवड्यातून राज्यात 40 लाख डोसची गरज आहे. आम्ही दिवसाला 4-5 लाख लोकांना लस देत आहोत, जर लस मिळाली नाही तर मोठी समस्या उद्भवू शकते. टोपे म्हणाले, 'आम्ही केंद्राच्या 6 लाख डोस रोज देण्याच्या चॅलेंजला स्वीकार करतो, मात्र व्हॅक्सीन असायला हवी'
पुण्यात 20 बेड देण्यास तयार झाले भारतीय सैन्य
पुण्यातील कोरोना नियंत्रणाबाहेर गेला आहे, यानंतर जिल्हा प्रशासनाने भारतीय सैन्याला मदत मागितली होती. पुण्यामध्ये व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्स फूल झाले आहेत. नवीन रुग्ण ठेवण्यासाठी बेड्स उपलब्ध नाही. अशा वेळी पुण्याच्या आर्मी हॉस्पिटलला सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यानंतर आर्मीने 20 बेड्स देण्याचे मान्य केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.