आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात पहिल्याच आठवड्यात थंडीची हुडहुडी:राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्र गारठले

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात थंडीची लाट पसरली आहे. पुढचे आणखी काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

नाताळानंतर राज्यातील काही भागातील थंडी कमी झाली होती. पण गेल्या दोन दिसांपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात घसरण झाली आहे.

उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टी

राज्यभरातील अनेक शहरांमध्ये 11 ते 12 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात बर्फवृष्टी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेकोट्या पेटल्या

राज्यात कडाक्याची थंडी पडत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागांतही शेकोट्या पेटवल्या जात आहेत. याशिवाय थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक उबदार कपडे घालत असून सकाळी गरमागरम चहा प्यायला पसंती देत आहेत. त्यामुळे आता राज्यात बदललेले वातावरण पुढील किती दिवस राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र संक्रांतीनंतर थंडीची हुडहुडी बऱ्याच अंशी कमी होते.

बातम्या आणखी आहेत...