आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत दर शुक्रवारी आणि शनिवारी असेल. या लॉकडाऊनमुळे 24 तास धावणाऱ्या मुंबईला ब्रेक लावले आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर आणि समुद्र किनाऱ्यावर चितपाखरुही दिसेना. सर्वत्र फक्त पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसत आहे.
लोकल, बस, टॅक्सीदेखील रिकाम्या
लॉकडाउनमध्येही पब्लिक ट्रांसपोर्ट म्हणजे ट्रेन, बेस्ट बस, ऑटो, काळी-पिवळी टॅक्सी सुरू आहेत. पण, यात एक-दोन लोकच दिसत आहेत. मुंहईटी लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्येही तुरळक प्रवासी दिसत आहेत.
मुंबईतील गर्दी असलेल्या परिसरात शुकशूकाट
सरकारची कठोर पाऊले आणि कोरोनाच्या भीतीने मुंबईतील नेहमी गर्दी असलेल्या दादर, माटुंगा, अंधेरी, ग्रांट रोड, वर्ली, कुर्ला, भिंडी बाजार, घाटकोपर आणि मशीद बंदरसारख्या परिसरातही तुरळक लोक दिसत आहेत. या परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसुली केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.