आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादेत आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत आहे, असा निशाणा त्यांनी यावळी साधला.
राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरु आहे, असा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
'मविआ सरकार पडेल असे वाटत नाही'
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाजपकडून वारंवार तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर मार्चमध्येच ठाकरे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत केले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडेल असे वाटत नाही, असे विधान केले आहे.
दरम्यान, राज्याची प्रकृती ठीक नाही, त्याला कारण राज्याला तीन डॉक्टर आहे असे म्हणत त्यांनी पेपरफुटी आणि ओबीसी आरक्षणावरून चिंता व्यक्त केली. तसेच राज्यात जे सरकार आहे ते सध्या पडेल असं वाटत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.
भाजपबाबत काय म्हणाले राज ठाकरे?
माझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत, भाजप किंवा इतर कोणाशी आघाडी करायची याविषयी मला काहीही सांगायचे नाही, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.