आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणपत्रिका:15 ऑगस्टपुर्वी मिळणार दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गुणपत्रिकांच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरु

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे यंदा घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रिकांच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडचणी येवू नयेत म्हणून मंडळाकडून 15 ऑगस्टपुर्वी गुणपत्रिका जिल्हानिहाय वितरीत करण्याचे नियोजन विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळातील पदाधिकाऱ्यांनी दिली.

दहावीनंतरच्या पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. तूर्तास विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यानंतर कॉलेज, अभ्यासक्रम आणि पसंतीक्रम भरले जात आहेत. मात्र, प्रवेश निश्‍चितीसाठी विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार गुणपत्रिकांसह अन्य कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यादृष्टीने बोर्डाकडून नियोजन करण्यात येत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी गुणपत्रिका वेळेत मिळाव्यात या हेतूने युद्धपातळीवर काम सुरू आहे. येत्या आठ दिवसांत संबंधित महाविद्यालयांना गुणपत्रिका पोच केल्या जाणार असल्याचे विभागीय बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.