आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सेल्फी घेणे दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना कारंजा तालुक्यातील धावसा हेटी येथे घडली आहे. येथील पाझर तलावाजवळ उमरीचे दोन तरुणांचा सेल्फी घेताना तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि. ५) जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा तालुक्यातील उमरी येथील पाच युवक गुरु पौर्णिमा निमित्ताने धावसा हेटी येथे असलेल्या दुर्गा देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी गेले होते. मंदिर परिसरात असलेल्या पाझर तलावाच्या काठावर पाच तरुणांची सेल्फी घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले असता, त्यामधील एका तरुणाचा पाय घसरला. त्यात सर्वांनी एकमेकांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले असता, पाचही तरुण तलावात बुडले असल्याचे दूर अंतरावर असलेल्या हर्षल धनराज कालभुत याला दिसताच त्याने पाचही युवकांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली. यावेळी तीन तरुणांना वाचविण्यात यश आले, मात्र हर्षल संजय चौधरी (वय 16) व तेजस राजेश चोपडे (वय 15) या दोघांचा मृत्यू झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.