आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन‎ शिक्षकांचा जागीच झाला मृत्यू‎

परभणी‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील‎ दोघा शिक्षकांना जोराची धडक दिली. यात‎ मानवत येथील दोघा शिक्षकांचा जागीच मृत्यू‎ झाल्याची घटना मंगळवारी (१४ मार्च)‎ सकाळच्या सुमारास घडली.‎ मानवत येथील शकुंतलाबाई कांचनराव‎ कत्रुवार विद्यालयातील शिक्षक गंगाधर राऊळ व‎ रामेश्वर कदम हे नेहमीप्रमाणे सकाळी दुचाकीवर‎ (एमएच २२ एएच ७०३१) शाळेत येत होते.‎ शहरातून जाणाऱ्या कल्याण-निर्मल राष्ट्रीय‎ महामार्गावर उड्डाणपूल येथे पाथरीकडून भरधाव‎ वेगाने येणाऱ्या (एमएच १३ आर ३६८४) ट्रकने‎ दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या‎ धडकेत दोघा शिक्षकांना जबर मार लागून मोठ्या‎ प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. उपचारासाठी त्यांना‎ तातडीने मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात नेले‎ असता वैद्यकीय अधिकाऱ्यानी मृत घोषित केले.‎ दरम्यान ट्रकचालक घटनास्थळावरून फरार‎ झाला आहे.‎

गतिरोधकाची आवश्यकता‎ पाथरीहून मानवत शहरात प्रवेश‎ करताना प्रताप चौकात कुठल्याही‎ प्रकारचे गतिरोधक नाहीत. राष्ट्रीय‎ महामार्ग कल्याण ते निर्मल क्र. ६१‎ यावरून सर्वच वाहने अतिशय वेगाने‎ जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या‎ घटनामध्ये वाढ झालेली आहे.‎ याकरिता गतिरोधक बसवण्याची‎ मागणी नागरिकांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...