आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानियमीत बीपीच्या गोळ्या घेणाऱ्या महिलेने नजरचूकीने उंदीर मारण्याचे औषध घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात वालुरमध्ये ही घटना घडली.
चुकून उंदीर मारण्याचे औषध घेतल्याचे लक्षात येताच महिलेला तात्काळ परभणीच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झाला.
प्रियंका संतोष टेकाळे(वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे. 4 एप्रील रोजी सायंकाळी तिने उंदीर मारण्याचे औषध घेतल्याची माहिती आहे.
नक्की काय झाले?
प्रियंका टेकाळे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्या नियमितपणे औषध घेत होत्या. दरम्यान, 4 एप्रीलच्या सायंकाळी बीपीच्या गोळ्या समजून नजरचूकीने त्यांनी उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या घेतल्या. काही वेळाने त्यांना उलट्या होऊन त्रास सुरू झाला. त्रास अधिकच वाढल्याने त्यांना तात्काळ वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर महिलेस परभणीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, महिलेची प्रकृती चिंताजनक होत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी 5 एप्रिल रोजी परभणीहून छत्रपती संभाजीनगर येथे नेण्याचं ठरलं. मात्र संभाजीनगला नेत असताना वाटेतच या प्रियांका यांची प्राणज्योत मालवली.
आकस्मिक मृत्यू
दरम्यान याप्रकरणी अनिल शामराव टेकाळे यांनी खबर दिल्यावरून परभणीच्या सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकाँ अशोक हिंगे हे करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.