आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. पुणे-बंगलोर महामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी ते थांबलेे होते. या घटनेत सयाजी शिंदे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पुणे बंगळुरू महामार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने झाडे वाचवण्यासाठी ते तासवडे येथे स्वत: उपस्थित होते. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आले.
शास्त्रीय पद्धतीने काटछाट
महामार्गाचे रुंदीकरण करताना बऱ्याच झाडांची कत्तल होते. मात्र यात जी झाडे वाचली आहेत, त्यांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करून पुन्हा पुनर्रोपण करायला हवे, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. याच कामासाठी हे पुणे- बेंगळुरू महामार्गावर उभे होते. त्याच दरम्यान त्यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला. आता ते सुखरुप आहेत.
“झाडांचं पुनर्रोपण करताना माझ्यावर काही मधमाशांचा हल्ला झाला. मानेजवळ थोडंसं सुजलंय. पण मी बरा आहे, काळजी करण्याचं कारण नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अभिनयासोबत वृक्षप्रेम
सयाजी शिंदे हे त्यांच्या दमदार अभिनयासोबतच वृक्षप्रेमासाठीही प्रसिद्ध आहेत. सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते राज्यात अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचे उपक्रम राबवतात. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी झाडांची कत्तल होते, त्याठिकाणी ते स्वत: पुढाकार घेऊन ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करतात.
एरवी चित्रपटात आणि चंदेरी दुनियाच्या पडद्यावर आपण सयाजी शिंदे यांना खलनायकाच्या भूमिकेत पाहात आलो आहोत. मात्र विविध त्यांचे वृक्षप्रेमसुद्धा तितकेच चर्चेत असते. विविध उपक्रमांमध्ये त्यांच्यातील वृक्षप्रेम आणि त्यासाठीची धडपड सर्वांनाच पाहायला मिळते.
सरकारवर ताशेरे
“महाराष्ट्रात होत असलेली वृक्ष लागवड हे केवळ एक नाटक आहे. राज्यात होणाऱ्या 5 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हे निव्वळ एक थोतांड आहे. वृक्ष लागवडीच्या मोहीमेतून भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जात आहे. त्याच खड्ड्यात वृक्षांची लागवड केली जाते,” अशी टीका त्यांनी सरकारवर केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.