आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या भीमा - कोरेगावप्रकरणी सहा प्रमुख राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना समन्स बजावण्याचे आदेश चौकशी आयोगाने दिलेत. त्यात मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंसह प्रकाश आंबेडकरांचे नाव आहे. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या अध्यक्षांना समन्स बजावण्यासाठी बुधवारी अर्ज दाखल केलाय.
अर्जात काय म्हटले?
प्रमुख राजकीय नेत्यांकडून भविष्यात हिंसाचार, कायदा सुव्यवस्थेच्या घटना टाळण्यासाठी व पोलिस, प्रशाकीय अधिकाऱ्यांना अशा घटना अधिक प्रभावीपणे नियंत्रणात आणता येण्यासाठी उपाय योजना आवश्यक असल्याचे सातपुते यांनी अर्जात म्हटले आहे. कोरेगाव भीमा - प्रकरणी आयोगाचे काम पुणे आणि मुंबईत सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रमुख पाच पक्षांच्या पक्षप्रमुखांना आयोगाकडून समन्स पाठवण्यात आले आहेत.
कोणा-कोणाला समन्स?
शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आणि रिपब्लिकन आठवले गट यांच्या पक्षांच्या प्रमुखांना हा समन्स पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, त्याबद्दल 30 जूनपर्यंत याबाबत म्हणणे सादर करावे लागणार आहे. राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे भीमा-कोरेगाव प्रकरण जाणून घेण्यासाठी हा समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन आठवले गटाचे रामदास आठवले यांना आयोगाने समन्स बाजावला आहे. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष यापूर्वीच नोंदवण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.