आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोकरीच्या शोधात शहरात आलो पण नोकरी मिळाली नाही आणि पैसेही नाही. पोटाची भूकही भागत नाही, मी आत्महत्या करतोय, माझा मृतदेह खड्ड्यात फेका दुःख व्यक्त करायला मला जवळच कोणीच नाही' अशी चिठ्ठी लिहून एका बेरोजगार तरूणाने केजुदेवी बंधाऱ्यात उडी घेत आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. 10) सकाळी थेरगाव येथे उघडकीस आला आहे.
पाण्यात दिसला मृतदेह
सुरेश कुमार (वय - 25, रा. केरळ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबरोबर काढला.
चिठ्ठीत हृदयद्रावक मजकूर
पोलिसांनी घटनास्थळी एक चिट्ठी मिळून आली आहे. यामध्ये ''मी शहरात नोकरीच्या शोधात आलो होतो. मात्र, मला काम मिळाले नाही. माझ्या खिशात पैसे आणि खाण्यासाठी अन्न नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्युनंतर दुःख व्यक्त करायला मला जवळच असं कोणीच नाही'', असे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. ही चिठ्ठी सुरेश यानेच लिहिली आहे का, तसेच, यामागे काही घातपात आहे का याबाबत वाकड पोलिस तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.