आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या टीव्हीवर जे राजकारण सुरू आहे ज्याची चर्चा समाजात, वर्तमानपत्रात हाेते. जे आपल्याला दिसते ते खरेच राजकारण आहे का? याचा सर्वांनी दाेन मिनिटे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण जे राजकीय नेते बाेलतात तेच माध्यमे दाखवतात. आपली वैचारिक बैठक कुठे गेली आहे? पक्ष कशासाठी आहे, त्याची धाेरणे काय आहेत हे पहावे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बाेलताना व्यक्त केले.
सुळे म्हणाल्या, महागाई ,बेराेजगारी सध्या वाढलेली आहे. राज्यातील दाेन माेठे प्रकल्प राज्याबाहेर गेलेत. राज्यातील ईडी सरकारने सिनारमास्ट कंपनी राज्यात रायगडमध्ये आणल्याचे सांगितले. परंतु ती महाविकास आघाडीच्या काळात आणली गेली. कागदपत्रे तपासून पाहावेत. पुण्यात अजित पवार पालकमंत्री हाेते तेव्हा विधान भवनमध्ये दर आठवडयाला अनेक नागरिक येऊन त्यांची कामे मार्गी लागत, असेही त्या म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.