आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

246 तक्रारीचे निवारण:शेतीमाल विक्रीनंतर 234 शेतकऱ्यांचे‎ अडत्यांनी थकवले 1 कोटी 21 लाख‎

उत्तर सोलापूर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीत अडत्याकडून‎ शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवले‎ जात आहेत. समितीच्या प्रशासनाने‎ वसुलीची प्रक्रिया राबवत‎ जवळपास पावणेदोन कोटी रुपये‎ वसूल करत शेतकऱ्यांना दिलासा‎ देण्याचा प्रयत्न केला आहे. हा‎ आकडा तक्रार दाखल केलेल्या‎ शेतकऱ्यांचा आहे, वास्तव‎ परिस्थिती वेगळी असून थकीत‎ रक्कम कैकपटीने जास्त आहे.‎ अडत्यांकडे थकीत रकमेसाठी‎ बाजार समितीकडे दाखला‎ झालेल्या तक्रारी ४८० आहेत.‎ त्यापैकी २४६ तक्रारीचे निवारण‎ झाले असून त्यापोटी १ कोटी ८२‎ रुपये वसूल झाले आहेत. अद्याप‎ २३४ शेतकऱ्यांचे १ कोटी २१ लाख‎ अडकले आहे.‎ सोलापूरच्या श्री सिध्देश्वर कृषी‎ उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही‎ वर्षात शेतीमालाचे पैसे‎ अडत्याकडून थकवण्याचे प्रकार‎ वाढले आहेत. विशेष कांदा‎ विभागात हे प्रकार वाढले आहेत .‎

कायद्याने शेतीमाल विकल्यानंतर‎ शेतकऱ्यांना पैसे तत्काळ देणे‎ बंधनकारक आहे. कांदा विक्रीनंतर‎ तब्बल महिन्यांनी पैसे देण्याची‎ चुकीची पद्धत बाजार समितीत‎ चालवली जात आहेत. काही‎ अडते हे महिना उलटला तरी‎ शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ‎ करतात. हतबल शेतकरी दररोज‎ आज तरी आपले पैसे मिळतील या‎ अपेक्षेने अडत्यांच्या दुकानासमोर‎ बसून राहतात . यातील काही‎ सुजाण शेतकरी या बाबत बाजार‎ समितीत लेखी तक्रार दाखल‎ करतात. तक्रार दाखल झालेल्या‎ शेतकऱ्यांची थकीत रक्कम वसूल‎ करण्याची कारवाई करत आहे.‎

थकीत आकडा हिमनगाचे टोक‎ शेतीमालाच्या थकीत बाकीसाठी बाजार समिती दाखल‎ झालेला आकडा आणि बाजार समितीत रक्कम‎ थकलेल्या शेतकऱ्यांची संख्या यात मोठी तफावत‎ असल्याचा दावा केला जात आहे. या मागे शेतकऱ्यांना‎ तक्रार करण्याच्या प्रक्रियेबद्दल असलेले अज्ञान व ते‎ तसे राहावे यासाठी बाजार समितीचे प्रयत्न त्याच‎ बरोबर अडत्यांना असणारे बाजार समितीतील‎ संचालकांचे राजकीय संरक्षण कारणीभूत आहे.‎

पैसे थकवणाऱ्या अडत्यांचा गाळा सील‎ करुन रक्कम वसुलीची तरतूद‎ ज्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसे थकवले जातात‎ अशा शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होतात संबंधित‎ अडत्याकडून शेतकऱ्यांच्या रकमेची वसुलीची प्रक्रिया‎ सुरू केली जाते. संबंधित आडत्याचा गाळा ताब्यात‎ घेऊन रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे. यामुळे‎ रक्कम थकलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क‎ करावा.‎ विनोद पाटील ,कांदा विभाग प्रमुख‎

बातम्या आणखी आहेत...