आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो तडफडत होता आणि...:पाण्याच्या मोटारीत करंट, 10 वर्षीय मुलाचा मृत्यू; वर्षभरातील चाैथी घटना, आणखी किती बळी घेणार?‎

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या लष्कर भागात मंगळवारी‎ ‎ पाणीपुरवठ्याचा दिवस‎ ‎ हाेता. पण वेळ निश्चित‎ ‎ नव्हती. अवेळी पाणी‎ ‎ आले. आई-वडील‎ ‎ कामाला गेलेले. त्यामुळे‎ ‎ १० वर्षीय शांतराज हा‎ ‎ मित्रांमध्ये खेळायला‎ ‎ जाण्याऐवजी पाणी‎ भरायला थांबला. पाण्याला दाब नसल्याने‎ माेटार जाेडायला गेला आणि विजेचा‎ धक्का बसून तडफडून जीव सोडला.‎

शेजारच्या तरुणांनी काठीने त्याला वेगळे‎ केले. शासकीय रुग्णालयात दाखल केले‎ असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू‎ झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.‎ शांतराज युवराज तल्लारे (वय १०, रा.‎ कुंभार गल्ली) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव‎ अाहे. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना‎ घडली.

मुलाचा मृत्यू झाल्याचे कळले अाणि‎ अाई शासकीय रुग्णालयात उभी काेसळली.‎ तिने फाेडलेल्या हंबरड्याने उपस्थितांनाही‎ अश्रू अावरता अाले नाहीत.‎ दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर शांतराज‎ याच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या संबंधित‎ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची‎ मागणी केली. त्याशिवाय मृतदेह ताब्यात‎ घेणार नाही, मृत मुलाच्या कुटुंबियांना ५० हजारांची तातडीची मदत करताना शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.‎ शिवाजीराव सावंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे.‎ असा पवित्रा घेतला हाेता. माेची‎ समाजातील मान्यवर अाणि राजकीय‎ क्षेत्रातील मंडळींनी पालिकेच्या ढिसाळ ‎ ‎ कारभारानेच मुलाचा जीव घेतल्याचा‎ अाराेप केला.

पाेलिसांनी त्यांची समजूत ‎ ‎ काढली. परंतु ते एेकण्याच्या मनःस्थितीत ‎ ‎ नव्हते. महापालिकेचे अधिकारी‎ घटनास्थळी फिरकलेदेखील नाहीत.‎ नेत्यांच्या मध्यस्थीने शेवटी मृतदेह ताब्यात ‎ ‎ घेऊन अंत्यसंस्कार करण्यात अाले.‎ शांतराजची आई धुणीभांडी करते तर वडील ‎ ‎ मजूर अाहेत. घरी फक्त दिव्यांग अाजी‎ अाहे.‎ ‎

सावंत, अा. शिंदेंकडून कुटुंबाला‎ अार्थिक मदत‎

राज्याचे अाराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ‎ ‎ घटनेची दखल घेऊन तल्लारे कुटुंबीयांना‎ ५० हजार रुपयांची तातडीची मदत दिली.‎ त्याचा धनादेश प्रा. शिवाजी सावंत यांनी‎ कुटुंबाकडे सुपूर्त केला. आमदार प्रणिती‎ ‎ ‎‎ शिंदे यांनीही अंत्यविधीसाठी १० हजार‎ रुपयांची मदत दिली.‎

नळाला मोटार‎ जोडणे कायदेशीर नाही‎

लष्कर परिसरात पाण्याला पुरेसा दाब‎ अाहे. परंतु अधिक दाब मिळवण्यासाठी‎ बहुतांश नागरिक नळाला माेटारी लावतात.‎ सर्वांनीच माेटारी जाेडल्या की, मागच्या‎ नळांचा दाब कमी हाेताे. नळांना माेटारी‎ लावणे कायदेशीर नाही. कुंभार गल्लीत‎ घडलेली घटना अतिशय दुर्दैवी अाहे. ताे‎ एक अपघात अाहे. अशा घटना घडू नयेत‎ म्हणून नागरिकांनीच काळजी घेतली‎ पाहिजे. पाण्याला दाब कमी असेल तर‎ महापालिकेकडे तक्रारी कराव्यात. त्यातील‎ दाेष काढण्याची यंत्रणा तत्परच अाहे.‎

-व्यंकटेश चाैबे, पाणीपुरवठा अधिकारी,‎ महापालिका‎

कमी दाबाने पाणी येत असल्याने‎ शांतराज हा नळाला मोटर जोडत‎ होता. तो पाण्याने भिजलेला होता.‎ विजेचा धक्का लागल्याने तो‎ जमीनीवर पडला, डोळे पांढरे झालेले‎ होते. तो तडफडत होता. त्यास‎ धरताना मलाही धक्का लागला.‎ माझ्या भावाच्या मदतीने काठीने‎ त्याला दूर केले. रुग्णालयात दाखल‎ केले, असे शेजारील सुनिल बोलेदुलू‎ यांनी सांगितले.‎

शहरातील पाणीपुरवठा कधीच‎ सुरळित हाेत नाही. शहरात ३५‎ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत‎ आहे. शहरभर वेळी, अवेळी, अपुरा,‎ कमी दाबानेच पाणीपुरवठा हाेताे.‎ संपूर्ण शहरभर नागरिकांची अाेरड‎ अाहे. त्यामुळे १ लाख ४० हजार‎ नळांपैकी सुमारे ७५ टक्के नळांना‎ विद्युत मोटारी लावून पाणी ओढले‎ जाते. त्यातूनच विजेचा धक्का लागून‎ नागरिकांचे बळी जात अाहेत.

गेल्या‎ वर्षभरातील अशा चार घटना घडल्या.‎ त्यात तीन महिलांचा मृत्यू झाला. या‎ सर्व घटना कामगार वसाहतमधल्या‎ अाहेत. महापालिका प्रशासनाने त्याची‎ अद्याप कुठलीच दखल घेतलेली‎ नाही. पाणीपुरवठा सुरळीत होईल‎ यासाठी काहीच होताना दिसत नाही.‎ पुन्हा पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत‎ होत आहे. दरम्यान, कर्नाटक पाणी‎ पळवत असतानाही प्रशासन केवळ‎ कागदी घोडे नाचवत आहे.‎