आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री वीरतपस्वी आत्मज्योत यात्रा:रथोत्सवात 18 कि. मी. चालले हजारो‎ भक्त, 400 जणांचा एक दिवस उपवास‎

सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य‎ महास्वामी यांच्या ६७ व्या‎ पुण्यतिथीनिमित्त सोमवारी श्री‎ वीरतपस्वी आत्मज्योत रथोत्सव यात्रा‎ भक्तिमय वातावरणात काढण्यात‎ आली. यामध्ये हजारो भक्तगण‎ सहभागी झाले होते. विशेष म्हणजे‎ सुमारे चारशे भक्तांनी एक दिवसाचा‎ उपवास करीत या मिरवणुकीचा १८‎ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला.‎ होटगी मठात सोमवारी महाप्रसाद‎ खाऊनच उपवास सोडण्यात आला.‎ उत्तर कसबा बाळीवेस येथील‎ बृहन्मठात मध्यरात्री २.१० वाजता श्री‎ वीरतपस्वी आत्मज्योत प्रज्वलन‎ करण्यात आले. यानंतर पहाटे पाच‎ वाजता आत्मज्योत मिरवणुकीला प्रारंभ‎ करण्यात आला.‎

यानंतर ही मिरवणूक चाटी गल्ली,‎ मधला मारुती, माणिक चौक, विजापूर‎ वेस, सात रस्ता, सिध्देश्वर साखर‎ करखाना, होटगी आदी मार्गांवरून‎ काढण्यात आली. या मिरवणुकीत या‎ संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक आणि‎ भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎ या मिरवणुकीत पालखी, रथ, पारंपरिक‎ वाद्ये होती. मिरवणुकीदरम्यान‎ काशीपीठाचे जगद्गुरू डाॅ.‎ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य‎ महास्वामी यांचे अनेकांनी आशीर्वाद‎ घेतले. जागाेजागी अनेक भक्तांनी‎ आत्मज्याेत मिरवणुकीचे स्वागत केले.‎

स्वच्छता दूतांच्या कामाला मदत करताना विद्यार्थिनी.‎ जागोजागी महाप्रसाद वाटप अन् स्वच्छताही‎ बाळीवेस ते हाेटगी मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. हजारो‎ भक्तांकरता जागोजागी चहा, नाश्त्याची सोय करण्यात आली होती. जिल्हा‎ परिषदेजवळील गुरू भेटसमोर मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वाटप करण्यात‎ आला. अनेकजण लाडू, केळी, चहा, पाणी, सुगंधी दूध, शिरा, उपीट असे‎ खाद्य पदार्थ वाटप करत होते. रस्त्यावर स्वच्छतादूतांनी स्वच्छता ठेवली‎ होती. यांच्या स्वच्छता कार्याला शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठा हातभार‎ लावला. जागोजागी कचरापेटी ठेवण्यात आली होती.‎

बातम्या आणखी आहेत...