आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीत वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. तेथे पालिकेचे अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चिती झाली असून, तेथे पाणी व फोम बंबसह इतर साहित्यासाठी २ कोटी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. तो जिल्हा नियाेजन समितीकडे दोन दिवसांत पाठवण्यात येणार आहे. तसेच आगीपासून बचाव करण्यासाठी कारखानदारांनी कोणती खबरदारी घ्यावी आणि काय नियोजन करावे याबाबत महापालिकेकडून कारखानदारांना पत्र देण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासक शीतल तेली यांनी सांगितले. आगीपासून सरंक्षण करण्यासाठी कारखानदारांनी साइड मार्जिन सोडणे, पाणी फवारण्यासाठी योग्य ते नियाेजन करणे, विद्युत आॅडिट करून घेणे आवश्यक आहे. विद्युत दाब कमी अधिक झाल्याने शाॅर्टसर्किट होऊन आग लागण्याचे प्रकार घडतात. याबाबत कारखानदारांना सजग करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.