आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवाच्या उत्क्रांतीमागे स्पर्धा आहे. जगण्यासाठी आणि टिकण्यासाठी सुद्धा स्पर्धा आहे. स्पर्धेला सहकाराची जोड मिळते तेव्हा उत्क्रांती होते. सहकारातून समृद्धी करणारी मंडळीच इथे आहेत. श्रीकांतजींची दृष्टी ही व्यक्तिकेंद्रित नाही तर त्यांची प्रेरणा ही सामाजिक आहे. कवितेतून ते व्यक्त होते. कविता हे जगणे असते. आत्मभानाला सामाजिक भानाची जोड आहे. वर्णनाच्या पुढे जाऊन चिंतनशील विचार बनवते.
विचार जिवंत नसतील तर काही साध्य होत नाही. जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. कवी श्रीकांत मोरे लिखित “मनोरम कविता, मनमुक्त, दुनियादारी, जीवनसरिता, रंगमंच, मन मानेल तसे” या सहा काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा पुणे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.
त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद मोरे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे, ‘सारथी’चे कार्यकारी संचालक अशोक काकडे, शैलेंद्र पोळ, प्रकाश पायगुडे, संभाजी काकडे, संजीवनी तडेगावकर, कवी श्रीकांत मोरे, शोभा मोरे, अस्मिता गायकवाड, संतोष सुरवसे, डॉ. दत्ता घोलप, उज्ज्वला साळुंखे, सुरेश शहापूरकर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.