आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व उद्योग गुजरातला जात असताना फडणवीस सत्तेवर कसे:आदित्य ठाकरेंचा सवाल, म्हणाले - फडणवीसांनी राजीनामा द्यावा

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कमालीचा पिछाडीवर आहे, असे असताना राज्याचे कृषी आणि उद्योग मंत्री काय करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होतो. राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला असताना रोजगारासाठीचे उद्योग थेट गुजरातला जात आहेत. अशावेळी राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे. सरकारची ही मस्ती लवकरच उतरणार असल्याचे सांगत ,हे घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणार ! हे लिहून घ्या, अशा शब्दात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर टीकेची झाड उठवली.

सोलापुरातील प्रभाग क्रमांक 10 मधील देगांव येथील शिवसेना शाखा कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

राज्यातील अनेक तरुण सध्या बेरोजगार असताना राज्यातील हे खोके सरकार आल्यापासून अनेक उद्योगधंदे गुजरातला जात असल्यामुळे महाराष्ट्र रिकामा होऊ लागला आहे. पुण्यातील तळेगाव येथे ते प्रकल्प आणणार होते. २ लाख लोकांना यामुळे रोजगार मिळाला असता. परंतु आता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे बेरोजगार युवक डोक्याला हात लावून बसले आहेत .आपलं सरकार असताना राज्य सुस्थितीत चालू होते .परंतु गद्दारी झाली आणि आपले सरकार पाडले गेले. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मोठा प्रकल्प गुजरातला पाठवला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना उद्योग मंत्री नेमके काय करत होते ? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज्यामध्ये सध्या घटनाबाह्य सरकार बसले आहे. हे सरकार आपल्याला पळवून लावायचे आहे, असे सांगत सरकार पडणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. 4 हजार कोटींची मदत देत असल्याची घोषणा आपण ऐकली होती. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र अद्याप एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही. विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करूनसुद्धा ओला दुष्काळ सरकारकडून जाहीर झालेला नाही .बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दारू विचारणाऱ्या कृषी मंत्र्यांचा "ओला" दुष्काळ मिटला .मात्र आपल्या ओल्या दुष्काळाचे काय झाले ? असे सांगत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...