आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेलतगव्हाण गावात रेल्वेगेट ते मारुती मंदिरापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. या कामाच्या तत्काळ चाैकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे बेलतगव्हाणचे सरपंच मोहनीश दोंदे, कांचन घोडे, पुष्पा धुर्जड, आकाश पागेरे, सुरेखा पाळदे, ताराचंद पाळदे, ज्ञानेश्वर पाळदे, राजेंद्र इंगळे आदीनीं मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.