आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याची नाेटीस आल्यानंतर मी आणि दिलीप साेपल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्थगिती आणली हाेती. त्याच वेळी धर्मराज काडादींनी चिमणी कायदेशीर करून घ्यायला पाहिजे हाेती. ही वस्तुस्थिती असताना आता ते भाजपवर आराेप करत आहेत. काडादींनी स्पष्ट राजकारण करावे. त्यांनी मैदानात यावे, मग पाहू काेणाची किती विश्वासार्हता आहे, असे आव्हान आमदार विजय देशमुख यांनी दिले आहे.
चिमणीच्या मुद्द्यावर काडादींनी माेर्चा काढून जाहीर सभा घेतली हाेती. त्यावेळी देशमुखांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न केले हाेते, असे वक्तव्य करून चिमणी पाडण्यासाठीच्या प्रयत्नांमागे आमदार विजय देशमुखच असल्याचा आराेप केला हाेता. त्याला आमदार देशमुख यांनी उत्तर दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.