आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर सोलापूर तालुक्यातील बारा रेशन दुकान परवान्यांसह जिल्ह्यातील नवीन ६१ दुकानांना परवाना देण्याची प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली. परंतु, नवीन परवाने देताना जुन्याच परवानाधारकांशी संबंधित संस्थांनाच मंजुरी दिल्याचा आरोप होताना दिसत आहे. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप होत आहे. याबाबत मंत्रालय पातळीपर्यंत तक्रारी दाखल झाल्या आहेत. प्रशासनाने मात्र कोणाचीही तक्रार नसल्याचे म्हटले आहे. विविध कारणांनी जिल्ह्यातील बंद झालेल्या ६१ रेशन दुकानांना नव्याने परवाने वाटण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा विभागाने राबवली.
यामध्ये परवाना देताना शासनाने ग्रामपंचायत, स्वयंसहाय्यता महिला गट, नोंदणीकृत संस्था अशांना प्राधान्य देण्याचा नियम घालून दिला आहे. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने शासनाच्या नियमांचा सोयीने वापर केल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. काही ठिकाणी परवाने देताना जुने रेशन चालकाच्या कुटुंबातील महिला चालवत असलेल्या गटांनाच नवीन परवाने दिल्याची तक्रार दाखल झाली आहे. काही ठिकाणी राजकीय दबावाखाली परवाने वाटप झाल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.
नवीन रेशन दुकान परवाने देताना नियमानुसारच कामकाज करण्यात आले आहे. आमच्याकडे कुठलीही तक्रार आली नाही. याबाबत कोणाची तक्रार असल्यास त्यांनी अपील करावे. - वर्षा लांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी
जिल्हा पुरवठा विभागाने नवीन रेशन परवाने देताना मूळ दुकानदारांनाच परवाने मिळावे याची काळजी घेतली आहे. इतर महिला बचत गटांची उमेद त्यांनी मारली आहे. - मनीषा लंबे , कळमन.
वरिष्ठ पातळीवर तक्रार केली
रेशन दुकानाचे परवाने देताना राबवलेली प्रक्रिया नुसता फार्स होता. मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. जुन्याच दुकानदारांना परवाने मिळावे अशी प्रक्रिया राबवली गेली. याबाबत मी वरिष्ठ पातळीवर तक्रारी दाखल केली आहे.- रोहिणी कुंभार, रानमसले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.