आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपवर नाराज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
देशभरात भाजपची घसरण सुरू आहे, केवळ 5 ते 7 राज्यात भाजपची सत्ता आहे. असे सांगतानाच सुप्रिया सुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत मोठी जबाबदारी घेणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलिसांचा वापर करणे चुकीचे
नियोजित बारसू प्रकल्पाला जनतेतून होणाऱ्या विरोधाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारीचा उद्योग सुरू आहे. त्याला या प्रकल्पाचा फटका बसणार असेल तर हे योग्य नाही. पोलिस बळाचा वापर करुन काम करुण घेतले जात असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत. लोकांना योग्य मोबदला दिला, चर्चा केली तर त्यातून मार्ग निघू शकेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
सुळेंवर मोठी जबाबदारी नाही
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणतीही मोठी जबाबदारी स्वीकारण्याची नाही. सध्या त्याचे ध्येय लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. नीतेश राणेंवर बोलण्यास मात्र, शरद पवारांनी बोलणे टाळले आहे.
सरकारवर हल्लाबोल
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात अवकाळी आणि गारपीट यांच्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडून अद्याप मदत करण्यात आली नाही, असे म्हणत पवारांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मविआ म्हणून निवडणूक लढणार
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. म्हणून लवकरात लवकर लोकसभेच्या जागेचे वाटप होणे गरजेचे आहे. जेणेकरुण उमेदवारांना आणि पक्षांना मतदारसंघात काम करायला संधी आणि वेळ मिळू शकेल असे मत पवारांनी व्यक्त केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.