आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाेटगी रस्त्यावरील विमानतळातून नागरी सेवेला सुरुवात झाली तर परदेशातील भक्तांची माेठी साेय हाेईल. पर्यटनाला चालना मिळेल, अशा भावना वारकरी संप्रदाय युवा मंचचे प्रदेश अध्यक्ष अक्षय महाराज भाेसले यांनी येथे मांडल्या.विमानसेवेसाठी सुरू असलेल्या चक्री उपाेषण स्थळी भेट देऊन त्यांनी पाठिंबा जाहीर केला. साेलापूर विकास मंचच्या पाठीशी वारकरी मंडळी असतील, अशी ग्वाही दिली. त्यांच्याशिवाय शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महाएनजीओ फेडरेशननेही पाठिंबा जाहीर केला. उद्योगधंदे, बहुराष्ट्रीय आस्थापने यासाठी विमानसेवा आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यांच्या समवेत फेडरेशन संचालक अमोल उंबरजे हेही हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.