आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Digital Invitation For Wedding Ceremony, New Look Of Surprise, Bride And Groom's Shopping Spree, Wedding Budget Is Increasing Due To Expenses.

शुभ मंगल सावधान:लग्न समारंभाचे डिजिटल आमंत्रण, आहेराचे‎ स्वरुप नवे, वधू-वरांचा खरेदीत चोखंदळपणा‎, खर्चामुळे वाढतेय लग्नाचे बजेट

प्रतिनिधी | सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या लग्न समारंभाच्या सगळ्याच‎ आवडीनिवडी बदलेल्या असून‎ अगदी आमंत्रणा पासून शालू,‎ मेकअप, फोटो व आहेराचे देखील‎ स्वरूप बदलले आहे. प्रचंड पैसा‎ खर्च करून केल्या जाणाऱ्या लग्न‎ समारंभात काही गोष्टी मात्र‎ साधेपणाने करण्यावरच भर दिला‎ जात आहे. सगळ्यात महत्त्वाचं‎ म्हणजे यात बस्ता हा प्रकार आता‎ दुर्मिळ झाला आहे. वधू-वरांच्या‎ आवडी निवडीनुसार पुण्या मुंबईत‎ खरेदी करण्याचा ट्रेंड सध्या जास्त‎ सुरू आहे. तर जिव्हाळ्यापासून‎ कलाकुसरीने सजवला जाणारा‎ रुखवताचा प्रकार हा जवळपास‎ नावापुरता उरला आहे.

पूर्वी‎ बैलगाडी, तुळस वेगवेगळ्या‎ बाहुल्या, साखरेच्या डिझाइनच्या‎ वस्तू आणि इतर गोष्टींच्या केल्या‎ जायच्या त्या आता नामशेष होत‎ आहेत.‎ पूर्वी साध्या मोत्यांच्या दोन पदरी‎ मुंडावळ्या वधू-वरासाठी‎ असायच्या. आता २०० ते ३०० रुपये‎ पासून अगदी हजार, दीड हजार‎ रुपये पर्यंत अनेक प्रकारच्या‎ कुंदनजडित, स्टोन जडीत‎ वेगवेगळ्या प्रकारच्या मण्यांच्या‎ मुंडावळ्या पाहायला मिळतात. पुणे,‎ मुंबईत लग्नाचे साहित्य, कपडे‎ खरेदीसाठी सोलापूरकर जातात.‎ नवनवीन प्रकारचे तसेच आधुनिक‎ स्वरुपातील साहित्यांची खरेदी तेथे‎ होते.

मे महिन्यात एकूण १४‎ लग्नाच्या तारखा आहेत. यंदाही या‎ तारखा दर वेळेपेक्षा अधिक मे‎ महिन्यात आलेल्या आहेत.‎ ‎ नदीकाठी, चिखलात,‎ वाळवंटात, गवताळ भागात, डोंगर‎ पठारावर जाऊन मंद धुं‌‌द अशा‎ वातावरणात भावी वधू वर‎ रेशीमगाठी बांधण्याअगोदर‎ वेगवेगळ्या आठवणी वेगवेगळ्या‎ फ्रेम मध्ये काबीज करण्याचा प्रयत्न‎ प्री वेडिंग शूटिंगच्या माध्यमातून‎ करत आहेत. वास्तविक जैन समाज ‎ ‎ आणि माहेश्वरी समाजाच्या अनेक ‎ ‎ दिग्गजांनी यावर बहिष्कार टाकला ‎ ‎ असून तशा शपथविधी घेतले‎ आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी यास ‎ महत्व दिले जाते‎

पत्रिका छापण्यापेक्षा समाज माध्यमाच्या सहाय्याने‎ व्हिडीओ पत्रिका पाठवून वेळेचा तसेच कागदाचा‎ खर्च वाचवला जात आहे. तसेच फोन करून‎ आमंत्रण देण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे‎ पूर्वीप्रमाणे दोन दोन तीन हजार पत्रिका छापल्या‎ जायच्या त्याचे प्रमाण सध्या कमी झाले आहे अशी‎ माहिती तेजस शहा या मुद्रण संचालकांनी दिली.‎

पुरणपोळ्या, मोदक, चटणी, भाजी, कोशिंबीर,‎ पालक, भरलं वांग, भेंडी अशा भाज्यांना आता पुन्हा‎ मागणी आली आहे. पुरणपोळीच्या जेवणाला अधिक‎ मागणी असल्याचे लक्षात घेऊन अनेक लग्नांमध्ये‎ पुरणपोळ्या आणि मोदकाचे ताट सांगितले जाते अशी‎ माहिती केटरर्स च्या संयोजकांनी दिली. अशा ताटाची‎ किंमत ही ३५० पासून अगदी ७५० रुपया पर्यंत किंमत‎ आहे. तर मारवाडी, गुजराती, माहेश्वरी, सिंधी,‎ पंजाबी या समाजामध्ये एकाच वेळी अनेक पदार्थ‎ ठेवण्याची पद्धत आहे. पाणीपुरी ते पिझ्झा, पुरणपोळी,‎ खव्याच्या पोळ्या, करंज्या, मंचूरियन, इडली ,डोसा‎ असे सगळे पदार्थ एकाच वेळी ठेवले जात. मात्र असे‎ दोन्ही प्रकार आता कमी होत आहेत.‎ आम्हाला मुंडाआहेर केला म्हणून रुसून बसणाऱ्या‎ अनेक मंडळींना सध्या असाच आहेर केला, तसाच‎ आहेर केला, तुझी साडी भारी माझी साडी भारी नाही,‎ अशी म्हणण्याची संधीच उरली नाही. कारण आहेराचे‎ देखील रूप बदलले आहे. याची खरी पद्धत सध्या‎ केवळ ग्रामीण भागात उरली आहे. वधू वरांना‎ आवश्यक अशा वस्तूंचा आहेर करण्याची किंवा‎ कलात्मक गोष्टी देण्याची पद्धत रुढ होत आहे.‎

पूर्वी लाजत मान खाली घालून येणारी वधू आता‎ नवऱ्याच्या सोबत बसून ओपन एंट्री करते आहे. भरपूर‎ फटाके, कागदी पताके आणि फुलांची उधळण करत,‎ डोली मधून तर कुणी बुलेट वरुन तर कुणी कारमधून एंट्री‎ करत आहेत. या कपल एन्ट्री इव्हेंटला ४० हजारांपासून ते‎ एक लाखापर्यंत पैसे लोक मोजतात अशी माहिती कपल‎ एंट्री स्पेशल राहुल राऊत यांनी दिली.‎

केवळ मंगळसूत्र सोन्याचे आणि बाकीचे इतर सर्व‎ दागिने हे टेम्पल ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी, नवनव्या‎ प्रकारच्या फुलांची डिझाईन आणि डिझायनर कपडे‎ अशा गोष्टींकडे तरुणींचा कल वाढला आहे. तर‎ मुलांमध्ये अतिशय साध्या पद्धतीने धोतर कुर्ता किंवा‎ शेरवानी धोतर अशा कपड्यांना वाव दिला जात आहे.‎ पूर्वी शिवले जाणारे कोट सूट किंवा थ्री पीस यांना‎ सध्या फाटा मिळत आहे. तर सॅटीनच्या भरजरी शालू‎ ऐवजी साध्या रंगाच्या जांभळ्या, गुलाबी आणि‎ हिरव्या, पिवळ्या अशा पैठणीला किंवा वर्कच्या‎ साडीला जास्त महत्व देत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या‎ जड शालूला आता ऑप्शन मिळाला आहे.‎

आम्हाला मुंडाआहेर केला म्हणून रुसून बसणाऱ्या‎ अनेक मंडळींना सध्या असाच आहेर केला, तसाच‎ आहेर केला, तुझी साडी भारी माझी साडी भारी नाही,‎ अशी म्हणण्याची संधीच उरली नाही. कारण आहेराचे‎ देखील रूप बदलले आहे. याची खरी पद्धत सध्या‎ केवळ ग्रामीण भागात उरली आहे. वधू वरांना‎ आवश्यक अशा वस्तूंचा आहेर करण्याची किंवा‎ कलात्मक गोष्टी देण्याची पद्धत रुढ होत आहे.‎