आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनाचा दुष्काळ:हिप्परगा कोरडा तेव्हाही सुरळीत,‎ आता 19 एमएलडी तरी ठणाणा‎

सोलापूर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची तहान भागवण्यासाठी प्रमुख तीन जलस्रोत‎ आहेत. यापैकी हिप्परगा तलावात दोन वर्षांपूर्वी अत्यल्प‎ पाणी होते, तरीही शहरात तीन ते चार दिवसांआड‎ पाणीपुरवठा सुरळीत होत होता. आता हिप्परगा तलावात‎ ८० टक्के जलसाठा आहे. तेथून रोज १९ दशलक्ष लिटर‎ पाणी भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात येते. तरीही‎ शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत आहे.‎ चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची २५ दिवसांची ‎ ‎ पालिकेने दिलेली मुदत संपली तरी पाणीपुरवठा सुरळीत‎ झालेला नाही.

सलगर वस्ती भागात पाण्यावाचून हाल होत‎ आहेत. या प्रश्नावर माजी नगरसेवक किसन जाधव यांनी‎ आंदोलनाचा इशारा दिला आहे.‎ हिप्परगा तलावापासून कालवा गायब‎ हिप्परगा तलावापासून शहरात कालव्याने पाणी येत होते.‎ रूपाभवानी मंदिर परिसरात आजही कालवा आहे पण‎ तलाव परिसरातील कालवा गायब झाला आहे. भोगाव‎ कचरा डेपो येथे मागील वर्षी आग लागल्यावर हिप्परगा‎ कालव्यातून पाणी घेऊन आग शमवली होती. तेथून पुढील‎ भागातील कालवा गायब आहे. सिंचन विभाग त्यावर‎ बोलण्यास तयार नाही.‎

हिप्परगा तलावातून यापूर्वी पाणी येत नव्हते,‎ त्यावेळी उजनी व टाकळी जलवाहिनीवरून‎ येणाऱ्या पाण्यातून शहराची तहान भागत होती.‎ आता हिप्परगासह उजनी व टाकळी येथून पूर्ण‎ क्षमतेने पाणी येत असतानाही शहरात पाण्यावरून‎ ओरड सुरू आहे. वितरण व्यवस्थेत अडचणी‎ असल्याचे दिसून येते. यामुळे भवानी पेठ, शाहरी‎ वस्ती, शेळगी त पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला.‎

पालिकेसमोर आंदोलन करू‎ ‎महापालिकेने पाणीपुरवठा‎ ‎ सुरळीत करावी, अन्यथा‎ ‎ पुढील काळात नागरिकांना‎ ‎ घेऊन पालिकेसमोर आंदोलन‎ ‎ करावे लागेल.‎ ‎ किसन जाधव, माजी नगरसेवक‎

हिप्परगा जलवाहिनीची रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती‎ हिप्परगा जलवाहिनीस पर्ल गार्डनजवळ गळती‎ सुरू असल्याने शेळगी नाल्यात पाणी वाया जात‎ आहे. पाच दिवस झाले तरी दुरुस्ती नाही. याबाबत‎ पालिका अधिकारी नीलकंठ मठपती यांना‎ विचारले असता, मंगळवारी रात्री दुरुस्ती करण्यात‎ आल्याचे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...