आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरिपातील साडेचार लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांना यंदा फटका बसत आहे. पडणारे धुके, अचानक वाढणारा गारवा, गरम होणे अशा विविध कारणांमुळे यंदाची रब्बी पिके अडचणी येण्याची शक्यता आहे. गहू पीक अडचण असतानाच हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ६० हजार ९१८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये हरभऱ्याचा पेरा ७२ हजार हेक्टरवर करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये हवामानातील बदलामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हे पीक सध्या काही ठिकाणी वाढीच्या तर काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन ते पोखरतात. एक अळी साधारण ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करत आहे.
कीटकनाशक फवारणी करावी गारवा, दिवसभर उन्हाची तीव्रता, मध्येच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. हरभरा पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ती तुरी, हरभरा, उन्हाळी भेंडी व इतर पिकांवर वाढते. वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रभाव दिसत असून त्यावर नियंत्रणासाठी किटकनाशकांची फवारणी करावी. डॉ. समाधान जवळगे, किटकशास्त्र अभ्यासक, कृषी विज्ञान केंद्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.