आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक शहरातून बंद केली आहे. रात्रीच्या दहा तासांत सुमारे दोन हजार जड वाहने शहरातून जाणार आहेत. त्यामुळे रात्री वाहतुकीची समस्या निर्माण होईल, याविषयी विचारले असता वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, प्रमुख चौकात रात्री वाहतूक पोलिस नेमण्यात येतील.
हैदराबाद, पुणे, तुळजापूर, सांगली, विजापूर, अक्कलकोट या सहा राष्ट्रीय महामार्गवरील टोल नाक्यावरून दररोज ३०३१ जडवाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. त्यापैकी दोन हजार वाहने शहरातून जात असल्याचा अंदाज आहे. या दोन हजार वाहनांना रात्रीच्या १० तासांत शहर पार करावे लागणार आहे.
रात्री नऊनंतर जड वाहतूक
शहरात रात्री नऊनंतर जड वाहतूक साेडली जाईल. जोपर्यंत वाहतूक सुरळीत होत नाही तोपर्यंत पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावतील. शहरात जडवाहतुकीचे दहा पॉइंट निश्चित केले आहेत. त्या सर्व ठिकाणी वाहतूक पोलिस हजर असतील. वाहतूक सुरळीत होईल.” -विश्वनाथ सिद, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा
आयुक्तांना भेटले
विविध वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांची भेट घेऊन निवेदन दिले. पूर्वीप्रमाणे जड वाहतूक सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनेक वाहतूक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जड वाहनांना दुपारी मुभा द्या
शहरात पूर्वी दुपारी एक ते चार या वेळेत जड वाहतूक सोडली जायची. त्याप्रमाणे जड वाहतूक सोडावी. अन्यथा रोजगार, व्यवसायावर परिणाम होईल. प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते. आता अंतिम निर्णय त्या पद्धतीने घ्यावा.’’- केतन शहा, व्यापारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.