आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पाेर्ट््सबद्दल अनास्था:मुले "मैदान'' मारणार कशी‎;जिल्ह्यातील 125 शाळांमध्ये क्रीडांगणेच नाहीत‎

‎डाॅ. रमेश पवार | साेलापूर‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य व राष्ट्रीय खेळाडूंची पाया भरणी ही शालेय‎ मैदानापासून होते. तसेच, शारीरिक व‎ मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्याने‎ मैदानी खेळ खेळणे आवश्यक असतेे. पण वाढते‎ शहरीकरण व जागेच्या अभावी शाळांचे मैदान‎ आता इतिहास जमा होताना दिसत आहे. त्यामुळे‎ मुले मैदान मारणार कशी, असा प्रश्न उभा‎ ठाकलेला दिसतोय. शाळांना मैदानेच नसतील तर‎ मान्यता कशा दिल्या, हा प्रश्न उपस्थित होतो .‎ जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या मिळून पहिली ते‎ बारावीच्या ४ हजार ७४० शाळा आहेत. त्यापैकी‎ १२५ शाळांना मैदानच नाही. त्यात शहरातील ५१‎ शाळांचा समावेश आहे. शहरातील शाळा मुलांना‎ विविध क्रीडा किंवा खेळाच्या तासाला इतर किंवा‎ शासकीय मैदानावर घेऊन जातात. काही शाळा‎ क्रीडा प्रकार शिकतोय म्हणून पालकांकडून‎ शुल्कही वसूल करतात. प्रत्यक्षात क्रीडा तासाला‎ मुलांना संगणक किंवा इतर ऑनलाइन द्वारे शिक्षण‎ देण्यावर भर देतात.‎ विद्यार्थ्यांत शारीरिक शिक्षण व खेळांविषयी‎ आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळांना मैदाने‎ असणे आवश्यक आहे. शाळेच्या मान्यतेसाठी‎ मैदानासह इतर अकरा निकषांची पूर्तता करावी‎ लागते. परंतु प्रशासनाने याकडे डोळेझाक करत‎ मान्यता दिल्याचे दिसते. शाळांच्या वेळापत्रकात‎ आठवड्यात दोन ते चार तास खेळाचे असतात,‎ पण अनेक शाळांना मैदानच नसल्याने खेळायचे‎ कुठे, असा प्रश्न मुलांना पडतो.‎

नियम काय सांगतो ‘आरटीई’ कायद्यांतर्गत प्राथमिक व‎ माध्यमिक शाळांना ११ निकषांची‎ पाहणी करुन मान्यता देण्यात येते.‎ त्यात क्रीडांगण, मुख्याध्यापकांचे‎ कार्यालय, स्वच्छतागृहे, पिण्याच्या‎ पाण्याची सोय, ग्रंथालय, अध्ययन‎ व अध्यापन साहित्य, शाळेला‎ कुंपण, स्वयंपाकगृह या निकषांचा‎ समावेश आहे. यातील सर्व निकष‎ नसल्यास शाळांना मान्यता देता येत‎ नाही. निकष पूर्ण न करणाऱ्या‎ शाळांची मान्यता रद्द करण्याचा‎ प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येतो.‎

नियमाला आहे पळवाट
शहरातील ५१ शाळांना मैदाने‎ नाहीत. काही शाळांनी क्रीडांगणाचे‎ भाडे करारपत्र दाखवून आरटीईची‎ मान्यता घेतली आहे. शिक्षण‎ विभागानेही मान्यता दिली आहे.‎ पण प्रत्यक्षात क्रीडांगणे नाहीत.‎ तासिकांमध्ये आठवड्यातील चार‎ तास खेळासाठी दिलेले असतानाही‎ संगणक किंवा इतर विषयाचा‎ अभ्यास उरकण्यावर भर दिला‎ जातो. काही शाळांमध्ये क्रीडा‎ शिक्षक देखील कार्यरत नाहीत.‎

कारवाई होणे गरजेचे‎
खेळामुळे विद्यार्थ्यांना‎आत्मविश्वास‎वाढीस लागून‎स्पर्धात्मक युगाची‎माहिती होण्यास‎मदत होते.‎खेळाचे तास‎ असले पाहिजे. मात्र शहरातील‎ बहुतांश शाळांमध्ये क्रिडांगणे‎ नाहीत,ही खेदाची बाब. शिक्षण‎ विभागाने कारवाई केली पाहिजे.-‎ गजानन काशीद, पालक‎

तंदुरुस्ती महत्त्वाची
मैदानी खेळ मुलांच्या सदृढ‎आरोग्य व‎बौध्दिक‎विकासासाठी‎आवश्यक आहे.‎आरोग्यही‎तंदुरुस्त व निरोगी‎ राह ते. व्यवस्थित भूक लागते.‎ मानसिक संतुलनासाठी खेळ‎ मदत करतो. खेळाडू वृत्ती निर्माण‎ होते.- डॉ.अण्णासाहेब‎ लोखंडे, बालरोगतज्ञ‎

बातम्या आणखी आहेत...