आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चिमणी कशी वाचेल? ती बेकायदाच

साेलापूर‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाेटगी रस्त्यावरील‎ विमानतळापासून नागरी उडान सेवा‎ देण्यात १०६ नव्हे, तर तब्बल १९८‎ अडथळे असल्याचा अहवाल हाती‎ आला आहे. त्या सर्वांना नोटीस‎ बजावून हटवण्याच्या प्रक्रियेत‎ कायदेशीर बाबींना भरपाई मिळू‎ शकेल. परंतु कारखान्याच्या‎ चिमणीला कुठल्याही प्राधिकरणाची‎ परवानगीच नाही. म्हणजेच‎ बेकायदेशीर असलेली चिमणी‎ कशी वाचेल? अडथळ्यांची गर्दी‎ वाढवल्याने त्यातून चिमणी वाचेल‎ असा समज कोणी करून घेऊ नये,‎ असे कारखान्याचे माजी तज्ञ‎संचालक संजय‎थोबडे म्हणाले.‎१९५३ मध्ये‎हाेटगी रस्त्यावर‎विमानतळासाठी‎भूसंपादन झाले.‎ त्यावेळच्या धावपट्टीची लांबी २००५‎ मीटर हाेती. त्यानंतर कारखाना‎ अाला. त्याच्या ५० मीटर उंचीच्या‎ दाेन चिमण्या अाल्या अाणि‎ ‘एअरक्राफ्ट रूल्स’ आले.

त्याने‎ धावपट्टीची लांबी १३६५ मीटर‎ झाली. २००४ मध्ये कारखान्याने‎ पाच हजार मेट्रिक टनाचा विस्तारित‎ प्रकल्प राबवला. त्यात ३८ मेगाव्हॅट‎ वीजनिर्मिती प्रकल्पाच्या‎ उभारणीसाठी जमिनीपासून ९२‎ मीटर उंच काे-जनरेशनची चिमणी‎ उभी केली. ज्याला प्रदूषण नियंत्रण‎ मंडळ, भारतीय विमानसेवा‎ प्राधिकरण, महापालिका‎ यांच्याकडून परवानग्याच नाहीत.‎ तरीदेखील डीजीसीएने १३६५‎ मीटरचीच धावपट्टी वैध ठरवली‎ अाणि नवीन चिमणीची उंची ५२‎ मीटर ठेवण्यास परवानगी दिली.‎ दुसरीकडे चिमणीच्या उंचीने‎ धावपट्टी नागरी विमानसेवेला‎ धाेकादायक बनल्याचा अहवाल‎ डीजीसीएने तयार केला. परिणामी‎ विमानसेवा चालू होऊ शकली‎ नाही. आता कारखान्याने केलेल्या‎ कोर्ट-कचेऱ्यांमुळे परत २००५ मीटर‎ पूर्ण धावपट्टी गृहित धरण्यात अाली.‎

तुम्हालाही विमानसेवा हवीच तर उत्तरे द्या‎
‘इन्व्हायरमेंट क्लिअरन्स’‎ मिळाल्याशिवाय विस्तारित प्रकल्प‎ राबवू नका, असे २०१४ मध्ये प्रदूषण‎ नियंत्रण मंडळाने बजावले हाेते. तरीही‎ प्रकल्प पूर्ण का केला?‎काे-जनरेशनच्या चिमणीचे‎ बांधकाम अर्धवट असताना‎ महापालिकेने बांधकाम बेकायदेशीर‎ असल्याची नाेटीस (कलम ४७८-२)‎ बजावली. त्याला का जुमानले नाही?‎ एनटीपीसीची चिमणी‎ विमानतळापासून दूर आहे. तरीदेखील‎ एनटीपीसीने डीजीसीएची‎ ‘ना-हरकत’ घेतली. उच्च‎ न्यायालयाच्या निकालात ही बाब‎ स्पष्ट अाहे की नाही?‎ राष्ट्रीय हरित लवादाने (रिट पिटीशन‎ नं. १२६०२/ २०२२) इन्व्हायरमेंट‎ क्लिअरन्स मिळाल्याशिवाय‎ कारखाना चालवू नये, असे स्पष्ट‎ निर्देश दिले असतानाही सुरू कसा?‎ हरित लवादाच्या निर्देशानुसार‎ कारखान्याने अनेक तांत्रिक चुका‎ करून ठेवलेल्या अाहेत. त्यावर दंड‎ झाल्यास त्याची व्यक्तीश: जबाबदारी‎ घेऊन दंड भरणार का?‎डीजीसीए चिमणीची जी उंची वैध‎ ठरवेल, ती मान्य करून पाडकाम‎ करून‎ विमानसेवा सुरू करण्यास‎ हातभार लावणार का?‎

बातम्या आणखी आहेत...