आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रोश:आरक्षणासाठी तुळजापूर ते मुंबई‎ ‘मराठा वनवास यात्रा’‎, 6 मेपासून सुरुवात; लेखी आश्वासने फार, प्रत्यक्ष‎ आरक्षणाशिवाय माघार नाही

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घटनात्मक 50 % च्या आतील ओबीसीमधूनच‎ मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या‎ मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने‎ तुळजापूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत ‘मराठा वनवास‎ यात्रा’ करण्यात येणार आहे.

सहा मे रोजी ‎तुळजापूरपासून यात्रेला प्रारंभ होईल आणि सहा‎ जून रोजी मुंबई मंत्रालयापर्यंत ही यात्रा पोहाेचणार‎ आहे. मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत‎ हे आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती गुुरुवारी ‎ पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पायी यात्रा असून, याच दिवशी आझाद मैदानावर‎ श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.‎

लेखी आश्वासने फार झाली. आता प्रत्यक्ष‎ आरक्षणा दिल्याशिवाय माघार नाही. या यात्रेत‎ सुमारे २५० समाजबांधव सहभागी होतील. या‎ यात्रेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पहाटे ५ ते‎ सकाळी १०, सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत‎ मार्गक्रमण केले जाणार आहे. सकाळी १० ते‎ सायंकाळी ५ वाजेपर्यंत विश्रांतीची वेळ असणार‎ आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी‎ योगेश केदार, प्रतापसिंह कांचन पाटील, सुनील‎ नागणे आदी उपस्थित होते.‎

ही यात्रा तुळजापूर, सांगवी, तामलवाडी, सोलापूर,‎ कोंडी, लांबोटी, यावली, शेटफळ, वरवड, टेंभुर्णी,‎ सरडेवाडी, गलांडवाडी नंबर १, पळसदेव,‎ भीमगवण, राबणगाव, पाटस, भांडगाव, म्हेत्रे‎ वस्ती, लोणी काळभोर, वाणवडी, लाल महल,‎ शिवाजी नगर, चिंचवड, सोमाटणे फाटा, कामशेत,‎ लोणावळा, महड फाटा, रायती वाणखळ,‎ देरावली, खारघर, वाशी, चेंबूर, दादर, भायखळा,‎ मुंबई असा यात्रेचा मार्ग आहे.‎