आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेत दर सोमवारी स्थायी समितीच्या सभागृहात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भरणारा जनता दरबार आता सोमवारपासून रद्द केला आहे. जनता दरबारात नागरिक आपल्या तक्रारी मांडत होते. यापुढील काळात तक्रारी ऐकून घेण्यासाठी पालिका प्रशासक आपल्या कार्यालयात दर सोमवार आणि गुरुवारी दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत उपलब्ध असतील.
नागरिकांचे तक्रारी अर्ज त्या स्वीकारतील. नागरिकांनी यापुढे सोमवार व गुरुवारी कार्यालयात भेट घ्यावी, असे आवाहन केले आहे. आयुक्त नसतील तर तक्रारी अर्ज कोण स्वीकारणार याबाबत पालिकेने माहिती दिली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.