आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यू तेलंगी पाच्छा पेठ येथील खड्डा परिसरात दाेन ते अडीच महिन्यांपासून गटारीचा वास असलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर दोनच दिवसांत या वाहिनीची दुरुस्ती झाली आहे. आता स्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून गढूळ पाणी येत होते. पाण्याला वास येत होता. पाण्याच्या दिवशी सुरुवातीला २५ ते ३० मिनिटे पाणी सोडून द्यावे लागत होते. मग पाणी भरावे लागत होते. पाणी उकळून थंड करून पिल्यानंतरही अनेक मुलांची प्रकृती बिघडली होती. याबाबत या परिसरातील नागरिकांनी महापालिका आणि झोनकडे वारंवार हेलपाटे मारले. कोणीही दखल घेतली नाही. ‘दिव्य मराठी’ने याबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनात हालचाल झाली आणि दुरुस्ती करण्यात आली, असे नागरिकांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.