आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष‎:विद्यापीठात 19 वर्षांत सर्व क्षेत्रांत महिलांकडून शोध; 217 जणींना पीएच.डी.‎

सोलापूर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले‎ यांच्या संघर्षामुळे महिलांना पिढ्यांपिढ्या बंद‎ असलेली शिक्षणाची दारे खुली झाली. त्यानंतर‎ सर्वच क्षेत्रातील शिक्षण घेत महिलांकडून यशाची‎ गगनभरारी सुरू आहे.‎ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर‎ विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या सर्व‎ अभ्यासक्रमांतून आतापर्यंत एकूण ७६८‎ संशोधकांनी शोधकार्य पूर्ण करत पीएच.डी.‎ मिळवली. या १९ वर्षांच्या काळात तब्बल २१७‎ महिलांनी संशोधन पूर्ण करत पीएच.डी. घेतली,‎ ही माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.‎ सोलापूर विद्यापीठाची स्थापना २००४ साली‎ झाली आहे.

एका जिल्ह्यासाठी असलेल्या‎ विद्यापीठात सुरुवातीच्या काळात फक्त ६०‎ महाविद्यालये कार्यरत होती. ती संख्या आता दुप्पट‎ झाली आहे. तसेच उच्च शिक्षण घेण्यामध्ये‎ मुलींचे प्रमाण ही वाढत आहे. विद्यापीठाकडून‎ आजपर्यंत देण्यात आलेल्या पीएच.डी. पदवीमध्ये‎ ३२ टक्के मुलींचा समावेश आहे. उर्वरित संख्या ही‎ मुलांची आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त‎ संशोधन क्षेत्रातील महिलांशी ‘दिव्य मराठी’ने‎ संवाद साधला असता, मुलींनी शिक्षणाची कास‎ सोडू नये, असा संदेश दिला.‎

भूमिहीन शेतमजुरांवर शोध, समस्यांवर उपाय‎ ‎ ग्रामीण विकास या विषयातून संशोधन‎ ‎ करत आहे. संशोधनात भूमिहीन शेतमजुर‎ ‎ (स्त्रीपुरुष) सामाजिक आर्थिक स्थितीचा‎ ‎ अभ्यास करणार आहे. विशेषता भूमिहीन‎ ‎ शेतमजूर महिलांना जगण्यासाठी कसरत‎ ‎ करावी लागते. त्यावर अभ्यास करून‎ सामाजिक व आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी त्यावरील‎ उपाय योजना सुचवण्यात येतील. महागाईमुळे घर खर्च,‎ मुलांचे शिक्षण सांभाळताना त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष‎ करतात. जास्तीत जास्त वेळ शेतमजुरी करून पैसे मिळवत‎ असतात. यावर संशोधन हाेईल.’’‎ स्नेहल नष्टे, विद्यार्थी संशोधक‎

मैत्रिणींनो, काहीही झाले तरी शिक्षणाची कास सोडू नका‎ कल्चरल स्टडीजवर पीएच.डी. करत असताना, कॅनडीयन आणि श्रीलंकन‎ ‎ कल्चर अभ्यासता आले. डायस्‍पोरा, मायग्रेशन, आयडेंटिटी‎ ‎ क्रायसिस, कल्चरल कॉनफ्लिक्ट यासारख्या बऱ्याच‎ ‎ संकल्पना आल्या. त्यातून एक महिला म्हणून जीवन जगत‎ ‎ असताना, अभ्यास व जीवन यात कुठेतरीच परस्पर संबंध‎ ‎ जाणवत होता. महिलांच्या बाबतीतही असेच होते. महिला‎ ‎ हक्काचे माहेर सोडून सासरी जातात, तेव्हा तिथे त्यांना‎ स्वतःची ओळख निर्माण करावी लागते. हे शिवधनुष्य केवळ महिलाच पेलू‎ शकतात. एक महिला म्हणून स्वतःच्या आयडेंटिटी सिद्ध करणे कठीण गोष्ट‎ असते. परंतु अशक्य मात्र नाही! मैत्रिणींनो, कितीही संकट आली तरी‎ शिक्षणाची कास सोडू नका. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे विसरू नका.’’‎ डॉ. माधुरी भोसले, शिक्षिका‎

बातम्या आणखी आहेत...