आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाेलेबाजी‎:काय हिरवळ... काय नरहरी झिरवळ,‎ आता झिरवळ गेला झुरळं हुडकायला‎; शहाजीबापूंचे संजय राऊतांना उत्तर

साेलापूर‎17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर‎ सर्वाेच्च न्यायालयाने गुरुवारी‎ निकाल िदला. त्यानंतर सांगाेल्याचे‎ अामदार अॅड. शहाजीबापू पाटील‎ यांनी खासदार संजय राऊत यांना‎ तिखट शब्दांत उत्तर दिले. म्हणाले,‎ ‘काय झाडी, काय नरहरी झिरवळ‎ अाता झिरवळ गेला झुरळं‎ हुडकायला...’‎

राऊत यांनी , ‘काय झाडी, काय‎ डोंगर, काय हिरवळ, आज वाट‎ पाहतोय तुमची नरहरी‎ झिरवळ…जय महाराष्ट्र!’ असे‎ ट्विट केले होते. या ट्विटचा अॅड.‎ पाटील यांनी त्याच शब्दांच समाचार‎ घेतला. पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या‎ सत्ता संघर्षासाठीच नव्हे, तर संपूर्ण‎ देशाच्या लोकशाहीसाठी एक‎ पथदर्शी म्हणून या निकालाकडे‎ पाहावे लागेल.

विधिमंडळाचे‎ कामकाज हे विधिमंडळाच्या‎ कायद्याने चालावे आणि त्या ‎ ‎ कामकाजाचे सर्व अधिकार हे ‎ ‎ अध्यक्षांना असावेत हा महत्त्वपूर्ण ‎ ‎ निकाल दिला. देशातील सर्व ‎ ‎ विधिमंडळांना ताकद आणि शक्ती ‎ ‎ देणारा असा हा निकाल आहे.’’‎

जनतेची कामे करावीत‎

यापूर्वीच्या‎ घडलेल्या घडामोडींबाबत विरोधी‎ पक्ष बोलत होते. पण, अाता सर्वोच्च‎ न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना‎ बाेलण्यास जागा नाही. महाराष्ट्राला‎ पुढे नेणारे हे सरकार अाता अधिक‎ जाेमाने काम करेल.''''‎

-विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भाजप‎

सर्वोच्च न्यायालयाचा मान राखणे‎ आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.‎ सर्वोच्च न्यायालयाने बरेच मुद्दे‎ स्पष्टपणे मांडले आहेत. आलेल्या‎ निकालामुळे शिंदे गटात आनंद आहे‎ तर ठाकरे गट समाधानी आहे. या‎ निकालामुळे शिंदे सरकार वाचले.''

-‎ फारूक शाब्दी, शहराध्यक्ष,‎ एमआयएम‎

सर्वाेच्च न्यायालयाने राज्यपाल‎ भगतसिंह काेश्यारी यांच्या अक्षम्य‎ चुका चव्हाट्यावर अाणल्या अाहेत.‎ त्यांच्यामुळेच या राजकीय‎ उलथापालथी झाल्या. त्याची शिक्षा‎ त्यांना झालीच पाहिजे. नैतिकता‎ म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.‎

-शरद काेळी, उद्धव ठाकरे शिवसेनेचे‎ गटाचे नेते‎

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला‎ निर्णय मान्य आहे. या निर्णयामुळे‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आनंद‎ झाला असेल. त्यांनी त्यांच्या‎ मुख्यमंत्री पदाच्या काळात जनतेची‎ कामे करावीत अन्यथा जनता त्यांना‎ त्यांची जागा दाखवून देईल.'''

-भारत जाधव, शहराध्यक्ष राष्ट्रवादी‎

न्यायालयाने स्पष्ट ताशेरे ओढत,‎ राज्यापालांच्या निर्णय प्रक्रियेवर‎ नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हे‎ सरकार दिशाभूल करुन सत्तेत आले‎ आहे. मुख्यमंत्र्यांनी नैतिकता‎ स्वीकारुन राजीनामा द्यावा. अन्यथा‎ अागामी निवडणुकीत जनता त्यांना‎ धडे शिकवेल. त्याचे पडसाद‎ महापालिका निवडणुकीत दिसून‎ येतील.

-चेतन नरोटे, काँग्रेस शहराध्यक्ष‎