आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजा:47 हजार टन युरिया तरी कृत्रिम टंचाई,‎ चढ्या दराने बागायतदारांनाच विक्री‎; सामान्य शेतकऱ्यांना दुकानदार देईना खत‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रांतील‎ रासायनिक खते गायब झाली आहेत. आठच दिवसांपूर्वी‎ सोलापूर जिल्ह्यातील दुकानदारांकडे ४७ हजार मे. टन युरिया‎ खत आले असताना दुकानदार खत उपलब्ध नसल्याचे‎ शेतकऱ्यांना सांगत आहेत.

काही दुकानदार ठराविक‎ ग्राहकांनाच तर काही दुकानदार चढ्या दराने खत विक्री करत‎ आहेत. युरिया खत उपलब्ध नसल्याचे मार्च आणि एप्रिल‎ महिन्यापासूनच दुकानदार सांगत आहेत. युरिया मुबलक‎ उपलब्ध असल्याचे कृषी विभाग सांगत आहे. यामुळे‎ शेतकऱ्यांसाठी आलेलं खत खातंय कोण, असा प्रश्न‎ उपस्थित झाला आहे.‎ महिनाभरात खरीप हंगामाची तयारी सुरू होईल, पण‎ त्यापूर्वीच जिल्ह्यात खत दुकानांमध्ये रासायनिक खतांची‎ कृत्रिम टंचाई जाणवत आहे.

सध्या जिल्ह्यातील‎ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. पावसाळा सुरू‎ होण्यापूर्वी शेतकरी खतांची खरेदी करतात, पण दुकानदार‎ आतापासूनच खतांचा तुटवडा आहे, खते आलीच नाहीत,‎ असे सांगून शेतकऱ्यांना पिटाळून लावत आहेत. काही‎ दुकानदारांनी तर खते आली होती पण दोन दिवसांतच संपली‎ असे सांगितले. प्रत्यक्षात आजही अनेक दुकानांमध्ये खते‎ शिल्लक असताना दुकानदार फक्त जे अधिक पैसे देतील,‎ अशा परिचयातील शेतकऱ्यांनाच खतविक्री करत आहेत.‎

२८० ची पिशवी तब्बल‎ ४०० रुपयांना विकताहेत‎

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा‎ गाळप हंगाम संपला आहे.‎ पावसाळा सुरू होण्यापूर्वी उसाची‎ मशागत करून खते टाकली जातात.‎ यामध्ये युरिया खताचा वापर मोठ्या‎ प्रमाणात होतो. त्यामुळे युरियाला‎ मोठी मागणी आहे. उसाची वाढ‎ जोमाने होण्यासाठी शेतकरी अधिक‎ दरानेही युरिया खरेदी करायला तयार‎ असतात. याचा गैरलाभ‎ घेण्यासाठीच २८० रुपयांची खताची‎ एक पिशवी ४०० ते ५०० रुपयांपर्यंत‎ विकली जात आहे. शेतकऱ्यांच्या‎ गरजेचा गैरफायदा घेण्यासाठी‎ अनेक दुकानदार युरियाची‎ साठेबाजी करत असल्याचे ऊस‎ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.‎

कृषी विभागाने करावी कारवाई‎

उसाची तोडणी झाल्यानंतर त्यासाठी‎ ‎ युरियाची मोठी मागणी असते. खत‎ ‎ दुकानदार याचा गैरफायदा घेऊन‎ ‎ जास्त दराने विक्री करतात. काही‎ ‎ दुकानदार दुकानात खत असूनही‎ ‎ नाही असे सांगतात. यावर कृषी‎ विभागाने तपासणी करून कारवाई करावी.

-विजय रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटना.‎

परवाना रद्द करून गुन्हा दाखल करू‎

कृषी दुकानांमध्ये युरिया उपलब्ध‎ ‎ आहे. जिल्ह्यास ४७ हजार मे. टन‎ ‎ खत उपलब्ध झाले आहे. त्याचे‎ ‎ तालुकानिहाय वाटपही केले आहे. जे‎ ‎ दुकानदार युरिया खत देणार नाहीत वा‎ ‎ चढ्या दराने खतांची विक्री करतील‎ त्यांचा परवाना रद्द करून गुन्हे दाखल करू.

-बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक.‎