आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्व नगर येथे दोन लेकरांना उशीने दाबून ठार करून आत्महत्या केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी पती सुहास चव्हाण, दीर सुशांत चव्हाण, सासू मंगल चव्हाण, नणंद सोनू जाधव आणि जाऊ रेखा चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
मृत ज्योती चव्हाण यांचे पती सुहास यास न्यायदंडाधिकारी यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. मृत ज्योती यांचे वडील दीपक व्यंकटराव गायकवाड यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पती, दीर, सासू आणि नणंद हे मृत ज्योती हिच्या चारित्र्यावर संशय घेत होते आणि पती हा तिला सतत मारहाण व शिवीगाळ करत होता. या सर्व जाचास कंटाळून ज्योती यांनी टोकाचे पाऊ उचलले. दोन्ही मुलांना ठार मारून स्वतः आत्महत्या केली.
शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पारशेट्टी यांनी आरोपीस ७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला. यात पोलिस अधिकारी बी. एम. देशमुख हे तपास करत आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड. सार्थक चिवरी तर आरोपींतर्फे अॅड. अभिषेक गुंड आणि अॅड. मनोहर गोविंदे यांनी काम पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.