आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संथगती:परीक्षांचे निकाल उशिरा लावण्यात‎ सोलापूर विद्यापीठ राज्यात अव्वल‎, नवे शैक्षणिक धोरण, गाइड लाइन जूनपर्यंत येणार‎

अजित बिराजदार | सोलापूर‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संथगती कामाचा फटका साेलापूर विद्यापीठात ‎ ‎शिकणाऱ्या ७० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना‎ बसत आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या दीक्षांत‎ प्रमाणपत्र वाटप करण्यास तब्बल पाच महिने‎ लावले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या परीक्षांचा‎ निकाल अजून जाहीर झालेला नाही. ८०‎ दिवसांहून अधिक कालावधी लोटला आहे.‎ तब्बल ४० टक्के अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर‎ होणे अद्याप बाकी आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा ‎ ‎ मंडळाकडून एकूण २४० अभ्यासक्रमांसाठी‎ परीक्षा घेतल्या जातात.‎ पुण्श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर ‎ ‎ विद्यापीठाच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू‎ झाल्या. आतापर्यंत ६० टक्के अभ्यासक्रमांचे‎ निकाल लागले आहेत. उर्वरित निकाल राम‎ भरोसे. यातून डिजिटल विद्यापीठाची बिरूद ‎ ‎ मिरविणाऱ्या सोलापूर विद्यापीठाची संथगती ‎ ‎ अधोरेखित झाली आहे. विद्यापीठाशी १०४ ‎ ‎ महाविद्यालये संलग्नित आहेत. यातील‎ विद्यार्थ्यांची संख्या पाहता प्राध्यापकांना‎ उत्तरपत्रिका तपासणीला खूप वेळ लागला आहे.‎

कुलपती कार्यालयाला द्यावा लागेल उशिराचा हिशेब‎‎

अभ्यासक्रमांचे‎ ‎ निकाल जाहीर‎ ‎ नाहीत. त्यामुळे‎ ‎ वॉर रूम तयार‎ ‎ केली आहे.‎ सतत आढावा घेतला जात आहे.‎ तांत्रिक अडचणींवर उपाय सुचवले‎ आहेत. त्यानुसार परीक्षा विभागाची‎ टीम कामाला लागली आहे.‎ अधिष्ठातांची नियुक्तीही झाल्याने‎ त्यांनाही सोबत घेऊन काम‎ करण्याची सूचना दिलीआहे. -डॉ. रजनीश कामत, प्रभारी‎ कुलगुरू, विद्यापीठ, सोलापूर‎

सुमारे ३५ हजार विद्यार्थी‎ निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. काही‎ अभ्यासक्रमांच्या मोजक्या‎ उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहेत.‎ कधी कधी पाच -सहा उत्तरपत्रिका‎ तपासणीसाठीही कॅप सेंटरवर‎ येण्याचा आग्रह प्राध्यापकांना धरला‎ जात आहे. संेंटरवर येऊनच‎ डिजिटल पद्धतीने उत्तरपत्रिका‎ तपासणी करण्याची पद्धत आहे.‎ उत्तरपत्रिका तपासणीचा वेग‎ त्यामुळेच मंदावला आहे. सेंटरवर‎ येऊनच उत्तरपत्रिका तपासायचे‎ असेल, तर मग ऑनस्क्रीनचा‎ पद्धतीचा उपयोगच काय?‎

तब्बल ४ लाख २० हजार‎ उत्तरपत्रिका तपासणीचे लक्ष्य‎ उत्तरपत्रिका तपासणीतील मानवी हस्तक्षेप‎ कमी व्हावा, निकाल वेगाने जाहीर व्हावा‎ यासाठी प्रथमच सर्व अभ्यासक्रमांच्या‎ उत्तरपत्रिका संगणकावर तपासण्याचा निर्णय‎ विद्यापीठाने घेतला. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही‎ पूर्व तयारी केली नाही. केवळ एक दिवसांची‎ कार्यशाळा उरकून आॅनस्क्रीन उत्तरपत्रिका‎ तपासण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर‎ टाकण्यात आली.

सुमारे ७० हजार‎ विद्यार्थ्यांच्या तब्बल ४ लाख २० हजार‎ उत्तरपत्रिका स्कॅन करणे, ते संगणकावर‎ अपलोड करण्याच्या दिव्य कामाचा अंदाज‎ परीक्षा मंडळास आला नाही. ते लवकर‎ होईल आणि प्राध्यापक ते ऑनस्क्रीन‎ तपासतील आणि हे काम अवघ्या काही‎ दिवसांत पूर्ण होईल, असे स्वप्न‎ विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने पाहिले‎ असावे. प्रत्यक्षात परीक्षा संपून ८० दिवस‎ उलटून गेले तरी ४० टक्के अभ्यासक्रमांचे‎ निकाल लावणे अद्याप बाकी आहे.‎