आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुना पुणे नाका ते हत्तुर बायपास दरम्यान ५४ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येत आहे. या मार्गावरील अवंती नगर येथील रेल्वे पुलाचे थांबलेले काम रेल्वे विभागाने पुन्हा सुरू केले आहे. काम पूर्ण होताच रेल्वचे शटडाऊन घेऊन पुलाचे मुख्य काम करण्यात येईल. यामुळे शहरातील जड वाहतूक वळवण्यास मदत होणार आहे. तसेच, मरिआई चौकाजवळील रेल्वे पुलावरून बंद केलेली जड वाहतूकही येथून वळवण्यास मदत होणार आहे. ५४ मीटर रस्त्याचे काम अवंती नगर रेल्वे पुलासह पूर्ण झाल्यावर शिवाजी चौकातील जड वाहतुकीसह वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे.
भूसंपादन आणि रेल्वे पुलाचे काम रखडल्याने या रस्त्याचे काम बंद होते. दरम्यान, सोलापूर महापालिकेने रेल्वे विभागाकडे १७ कोटी रुपये भरले होते. तरीही काम बंद असल्यामुळे पालिका प्रशासक शीतल तेली यांनी रेल्वे विभागास पत्र लिहले. त्यामुळे रेल्वे विभागाने पुलाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी स्टीलची आवक केली आहे. आता लवकरच रेल्वे शटडाऊन घेऊन पुलाचे मुख्य काम पूर्ण करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.