आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढा:सीना नदीच्या पात्रात बुडत असलेल्या दोघांचे गावच्या दोन महिलांनी वाचवले प्राण, महिलांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेचे कौतुक

माढा (सोलापुर) / संदीप शिंदे2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रामपंचायत करणार राष्ट्रपती शौर्य पदक मिळण्यासाठी ठराव

माढा तालुक्यातील राहुल नगर गावातील सीना नदीच्या पात्रात दोघे जण बुडत असताना प्रसंगावधानता दाखवत गावच्या महिलांनीच त्याचे प्राण वाचवलेत. राधिका राजेंद्र भोई, राणी धोंडीराम भोई अशी त्या दोन धाडसवान महिलेची नावे असुन प्रितम नंदकुमार शिंदे ( वय ९), दिनकर ओहोळ( वय ३८) या दोघांचे प्राण त्यांनी वाचवलेत. ही घटना गावच्या सीना नदीच्या पात्रात रविवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. २६ /११ च्या दहशतवादी हल्यात हौतात्म्य पत्करलेल्या राहुल शिंदे यांच्या नावामुळे या गावाला ओळख होती. नुकतेच या गावाचे नाव सुलतानपुर ऐवजी राहुलनगर देखील करण्यात आले आहे. गावात घडलेल्या घटनेमुळे राहुलनगर वासियांची मान अभिमानाने निश्चितच उंचावली गेली आहे.

दोन्ही महिलांच्या सतर्कतेमुळे गावावरची मोठी दुर्घटना टळली
सीना नदीच्या पात्राच्या कडेला प्रितम शिंदे हा खेळत असताना त्याचा तोल गेल्याने तो नदी पात्रात बुडत असल्याची बाब परिसरात काम करित असलेल्या दिनकर ओहोळ यांना दिसताच प्रितम ला वाचवण्यासाठी त्यांनी नदीत उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधीक असल्याने दोघे वाहत पुढे चालले होते.

नदी पात्राच्या कडेलाच कपडे धुवत असलेल्या राधिका भोई,राणी भोई यांना आरडा ओरड ऐकु ऐताच त्यांनी त्या दिशेने धाव घेतली.दोघे ही पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहत जात असल्याचे त्यांना दिसले. "तुम्ही आरडा ओरड करु नका घाबरु नका ... आम्ही तुम्हाला सुखरुप बाहेर काढु "असा धीर देत दोघींनीही तत्परतेने नदी पात्रात उतरुन पाण्याच्या प्रवाहात जात साडीचा आधार घेत त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन पाण्याच्या बाहेर सुखरुप देखील काढले. जीवावर उदार होऊन दोघांचे प्राण वाचवलेल्या या जिजाऊ सावित्रीच्या लेकीचे गावांसह परिसरातील गावातुन कौतुक होत असुन त्याचे धाडस वाखाणण्याजोगे असेच आहे.

या दोन्ही महिलांची सतकर्ता आणि दाखवलेल्या धाडसामुळे आमच्या गावावरची मोठी दुर्घटना टळली आहे. महिलांचे कौतुक करावे तेवढे कमीच असुन दोन्ही महिलांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देण्याचा ठराव ग्रामपंचायत मध्ये ठेवण्यात येणार असुन तो मंजुर करुन घेत शासनदरबारी पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गावचे सरपंच रोहनराज हनुमंत धुमाळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...