आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. रंगपंचमी वापरण्यात येणारे कृत्रिम व विविध रसायनयुक्त रंग हे शरीराला हानी पोहोचवू शकतात. निसर्गातील उपलब्ध साहित्यातून रंग बनवून त्याचा वापर रंगपंचमी निमित्त करण्यात यावा. असा संदेश देत निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. प्रात्यक्षिकातून रंग निर्मिती केली, निसर्गनिर्मित रंगाचे फायदे विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी संजय भुईटे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गनिर्मित रंग, निर्मिती, कोणते रंग बनवता येतात, त्याचा वापर, त्याच्या वापरातील फायदे व कृत्रिम रंगाचे शरीरावर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून व स्व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नैसर्गिक रंगनिर्मिती करून दाखविले. या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य डी. डी. गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले. उर्मिला लंबे यांनी सूत्रसंचालन केले. पूनम पाटील यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.