आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनआयएने २०१९ ते २०२२ दरम्यान दहशतवादाशी संबंधित ४९७ प्रकरणांत गुन्हे दाखल केले. त्यापैकी ६७ खटल्यांत निकाल आला. ६५ प्रकरणात आरोपींवरील दोष सिद्ध झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले, २०१९ ते २०२२ दरम्यान झालेल्या तपासात केवळ दोन प्रकरणात आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत. यावरून तपास संस्थेची प्रामाणिकता व पारदर्शकता सिद्ध होते. एनआयए कोणत्याही समुदायाला लक्ष्य करत नाही. एका अन्य प्रश्नावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, तेलंगणा, मेघालयासह ९ राज्यांनी सीबीआय तपासाची परवानगी मागे घेतली आहे. अपमानजनक पोस्ट प्रकरणात सीबीआयने २०१९ नंतर १५ गुन्हे दाखल केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.