आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाश्मिरी पंडितांना पुरेशी सुरक्षा दिली जावी, त्यांचा आवाज दडपला जाऊ नये, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.काश्मिरी पंडित समुदायाला लक्ष्य केले जात आहे. नव्वदच्या दशकात तशा प्रकारच्या घटना घडल्या. म्हणूनच त्यांना खात्रीशीर सुरक्षा दिली जावी. केंद्र सरकारला माझे आवाहन आहे. त्यासाठी आपण एकत्र येऊन काम करू. आवश्यक असेल तेथे आम्ही आमची भूमिका निभावू, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. हिंदू शिक्षिकेच्या हत्या प्रकरणात जम्मू्च्या सांबा व कठुआ जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.