आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या मंगळवारी (8 नोव्हेंबर) नोटाबंदीला सहा वर्षे होतील. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, "काळा पैसा आला नाही, फक्त गरिबी आली आहे. अर्थव्यवस्था कॅशलेस नाही. तर कमकुवत झाली आहे. दहशतवाद संपला नाही तर करोडो छोटे उद्योग आणि नोकऱ्या उद्ध्वस्त झाल्या. 'राजा'ने '50 दिवस'च्या बहाण्याने अर्थव्यवस्थेचे DeMo-lition केले.
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनीही केला हल्लाबोल?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अद्याप आपले अपयश स्वीकारलेले नाही. यामुळे अर्थव्यवस्था कोलमडल्याचा दावाही खऱगे यांनी केला. त्यांनी ट्विट केले की, "देशातून काळा पैसा संपवण्याचे आश्वासन देऊन नोटाबंदी आणली गेली. पण त्यामुळे व्यवसाय आणि नोकऱ्या उद्ध्वस्त झाल्या. या 'मास्टरस्ट्रोक'च्या 6 वर्षांनंतर 2016 च्या तुलनेत रोख 72 टक्क्यांनी जास्त आहे.
नोटाबंदीनंतर 9.21 लाख कोटी काळा पैसा जमा
2016 च्या नोटाबंदीच्या वेळी, केंद्र सरकारला किमान 3-4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा भ्रष्टाचारी लोकांच्या घरांच्या गाद्या आणि उशांमध्ये दडवून ठेवण्यात आल्याची अपेक्षा होती. मात्र, या संपूर्ण कवायतीत केवळ 1.3 लाख कोटींचा काळा पैसा बाहेर आला. येथे वाचा पुर्ण बातमी
नोटाबंदीनंतर 500-2000 च्या 1680 कोटी नोटा गायब झाल्या... RBI कडे हिशोब नाही
2016 च्या नोटाबंदीच्या वेळी, केंद्र सरकारला किमान 3-4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर येईल अशी अपेक्षा होती. पण, केवळ 1.3 लाख कोटी काळा पैसा बाहेर आला. पण नोटाबंदीच्या वेळी जारी करण्यात आलेल्या 500 आणि 2000 च्या नव्या नोटांपैकी आता 9.21 लाख कोटी गायब झाले आहेत. येथे वाचा पुर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.