आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद साखळी स्फोट प्रकरणी न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. 26 जुलै 2008 साली झालेल्या या स्फोटाप्रकरणी न्यायालयाने अखेर आरोपींना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या 49 आरोपींपैकी 39 जणांना फाशी तर 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदा एकसोबत इतक्या मोठ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिव्य मराठीने या प्रकरणाचे तपास करत असलेले पोलिस अधिकारी आरवी असारी यांच्यासोबत या प्रकरणासंदर्भात बातचीत केली आहे. अहमदाबादचे जॉइंट पोलिस कमिश्नर असारी यांनी सांगितले की, संपूर्ण देशात तपास केल्यानंतर या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी गोधरा या ठिकाणी कार्यरत होतो.
असारी म्हणाले की, 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला होता. तेव्हा मी गोधरा येथे ड्यूटीवर होत होते. मला एक फोन आला, मला तात्काळ अहमदाबाद क्राइम ब्रांचमध्ये बोलण्याचे आदेश देण्यात आले. संपूर्ण गुजरात राज्यात या स्फोटाच चर्चा सुरू होती. आमच्या टीमला या स्फोटामागे कोणाचा कट आहे हे शोधण्याचे काम देण्यात आले.
दाणीलिमडा इमारतीत बॉम्ब बनवण्याची लिंक सापडली
“माझे वरिष्ठ अधिकारी अभय चुडासामा यांनी माझ्यावर बॉम्बस्फोटासाठी वापरलेली सामग्री दहशतवाद्यांनी कोठे तयार केली होती, आणि बॉम्ब कोठे बनवले होते? हे शोधण्याचे काम माझ्यावर सोपवले होते. तसेच त्याचे सर्व पुरावे गोळा करण्यास देखील सांगितले. यादरम्यान अनेक अधिकारी माझ्या टीममध्ये सामील झाले आणि आम्ही हळूहळू RDX (प्लास्टिक एक्स्प्लोझिव्ह) स्टोरेज एरिया आणि त्याच्याशी संबंधित संशयास्पद सामग्री कुठे सापडेल हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. यादरम्यान, मला एक लिंक मिळाली, ज्यामध्ये दानिलिमडा भागातील एका घरात दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती. मी माझ्या अधिकाऱ्याला कळवले आणि आम्ही तिथे पोहोचलो. त्यावेळी आम्हाला मिळालेल्या एका टिप्सने दहशतवाद्यांचे ठोस पुरावे दिले.
चार महिन्यांपर्यंत घरी नाही गेलो
आमच्या टीमवर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करा असे वारंवार आम्हाला आदेश देण्यात येत होते. त्यामुळे आम्ही सलग चार महिने रात्रंदिवस काम केले. सकाळी नऊ वाजता जेवण केल्यानंतर आम्हाला दिवसभर आणि कधी कधी रात्री देखील उपाशी पोटी राहावे लागले. चार महिन्यांपर्यंत आम्ही घरी गेलो नसल्याचे असारी म्हणाले.
हजारो किलोमीटर लांब होते दहशतवादी
पुढे असारी म्हणाले की, संपूर्ण देशात आम्ही दहशतवाद्यांचा तपास केला. त्यानंतर त्यांना अहमदाबाद क्राइमब्रांचमध्ये आणण्यात आले. एका आरोपीला घेण्यासाठी आम्हाला कर्नाटकामध्ये जावे लागले. त्याला आम्ही अहमदाबादमध्ये आणत असताना आम्हाला धमकी देण्यात आली होती की, इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी तुमच्यावर हल्ला करू शकतात. त्यामुळे आम्ही पाणी पिण्यासाठीही वाहन थांबवले नाही. कर्नाटकातून अहमदाबादपर्यंत आम्ही न थांबता 1163 किलोमीटरचा प्रवास केला. उज्जैनमधूनही आम्ही काही दहशतवाद्यांना आणले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.