आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shah Said It Happened For The First Time That The Opposition Blocked The Parliament For His Disqualification

राहुल गांधी यांनी संसदेचा वेळ वाया घालवला:अमित शहा म्हणाले- त्यांच्या अपात्रेसाठी विरोधकांनी संसद ठप्प केली, असे प्रथमच घडले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र आझमगडमधील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले.  - Divya Marathi
हे छायाचित्र आझमगडमधील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. 
  • अमित शहांचे राहुल गांधींना आव्हान : म्हणाले- मैदान ठरवा, भाजप दोन हात करायला तयार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना उत्तर प्रदेशात आव्हान दिले आहे. शुक्रवारी कौशांबी येथील जाहीर सभेत त्यांनी राहुल यांचे नाव घेत म्हटले - तुम्ही मैदान ठरवा, भाजपचे लोक देशात कुठेही लढायला तयार आहेत.

शाह पुढे म्हणाले की, सोनियाजी असोत, राहुलजी असोत की अन्य कोणीही, मोदीजींना जेव्हा-जेव्हा शिवीगाळ झाली, तेव्हा जनतेने या शिवीगाळांच्या चिखलात कमळ फुलवले आहे. पीएम मोदींना शिव्या देणाऱ्यांचे नशीब वाईट आहे. राहुल गांधींच्या बाबतीतही तेच झाले. त्यांची खासदारकी गेली. आता ते केंद्र सरकारवर आरोप करत आहेत की, त्यांची खासदारकी आमच्या राजवटीत गेली. वास्तविक या नियमानुसार आतापर्यंत 17 नेत्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

हे छायाचित्र गृहमंत्री अमित शहा कौशांबी येथील जाहीर सभेला संबोधित करतानाचे आहे.
हे छायाचित्र गृहमंत्री अमित शहा कौशांबी येथील जाहीर सभेला संबोधित करतानाचे आहे.

लोकशाही नाही, त्यांचे कुटुंब धोक्यात

अमित शहा म्हणाले की, ‘ते म्हणतात की लोकशाही धोक्यात आली आहे, खरे तर त्यांचे कुटुंब धोक्यात आहे, लोकशाही नाही. विरोधी पक्षनेते संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. संसदेचा वेळ वाया घालवल्याबद्दल देशातील जनता राहुल गांधींना कधीही माफ करणार नाही. काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत. काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही.

अमित शहांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे...

कौशांबी येथील हेलिपॅडवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले.
कौशांबी येथील हेलिपॅडवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले.

1. राहुल गांधींनी न्यायालयात जावे. देशाच्या संसदेचा बहुमोल वेळ त्यांनी वाया घालवला. देशातील जनता सर्व काही पाहत आहे, त्यांना ते कधीही माफ करणार नाहीत.

2. लवकरच भगवान रामजी त्यांच्या मंदिरात असतील. सपा आणि बसपने मंदिराच्या उभारणीत अनेक अडथळे निर्माण केले. आम्ही त्याचा मार्ग मोकळा केला आणि आता अयोध्येत भव्य मंदिर बांधले जात आहे.

3. पीएम मोदींनी आता उत्तर प्रदेशातील जातीवाद, कुटुंबवाद आणि तुष्टीकरणाला संपवले आहे. आता यूपीच्या लोकांनी याच्या पुढे जाऊन विचार करावा.

4. योगीजींच्या नेतृत्वाखाली राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे. त्यांच्या राजवटीत राज्यात एकही दंगल झाली नाही.

5. पूर्वीचे यूपी आम्हाला चांगले आठवते. ग्रामीण भागात रमजानच्या काळातच वीज उपलब्ध होती. आज संपूर्ण यूपीला वीज मिळत आहे.

कौशांबी उत्सवाच्या ठिकाणी गृहमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक बुलडोझरवर बसले होते.
कौशांबी उत्सवाच्या ठिकाणी गृहमंत्र्यांचे भाषण ऐकण्यासाठी लोक बुलडोझरवर बसले होते.

यूपी विकासाच्या मार्गावर

अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी यांनी आजमगडमधील नामदारपूर येथे 4583 कोटी रुपयांच्या 117 प्रकल्पांची पायाभरणी केली. शाह म्हणाले की, ‘मी यापूर्वीही आझमगडमध्ये आलो आहे. पूर्वी इथे रात्री वीज नव्हती, पण आमचे सरकार आल्यापासून. लोकांना 24 तास वीज मिळत आहे. यूपीमधील एकही गाव असे नाही जिथे वीज पोहोचली नाही. हर घर नल योजनेतून 60 टक्के लोकांच्या घरात पाणी पोहोचवण्याचे काम केले आहे. 2024 मध्ये सुद्धा तुम्ही लोक नरेंद्र मोदींना जिंकवून पंतप्रधान बनवा, असे आवाहनही त्यांनी केले.

सीएम योगी म्हणाले - आझमगडचा विकास आम्ही कधीच थांबू दिला नाही

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘पाच वर्षांपूर्वी येथील तरुणांना त्यांची ओळख सांगण्याची अडचण वाटत होती. बाहेर गेल्यावर त्यांनाा ओळख लपवायला लागत होती. कारण तसे ांगितल्यावर हॉटेलमध्ये खोल्या मिळत नव्हत्या.

हरिहरपूरमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी यांनी संगीत घराण्याशी संबंधित कलाकारांची भेट घेतली.
हरिहरपूरमध्ये गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी यांनी संगीत घराण्याशी संबंधित कलाकारांची भेट घेतली.

संगीत क्षेत्रातील लोकही हरिहरपूरला पोहोचले

गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी दुपारी 3.15 वाजता आझमगडमधील नामदारपूर विमानतळावर हेलिकॉप्टरने उतरले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. तेथून दोघेही हरिहरपूरच्या संगीत घराण्यात पोहोचले. येथे संगीत महाविद्यालय बांधले जाणार आहे. गृहमंत्री शाह आणि सीएम योगी यांनी सुमारे 20 मिनिटे कलाकारांची भेट घेतली.