आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी बिहारमधील सासाराम आणि नालंदा येथे हिंसाचार झाला. नालंदामधील बिहार पोलिस स्टेशन हद्दीतील पहारपूर आणि उस्तर दर्गा दरम्यान दोन बाजूंनी गोळीबार झाला. यामध्ये दोन जणांना गोळ्या लागल्या आहेत. नंतर त्यातील एकाचा मृत्यू झाला.
नालंदामध्ये शुक्रवारी ज्या ठिकाणी हिंसाचार झाला, त्या ठिकाणापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर शनिवारी पुन्हा हिंसाचार झाला. यावेळी सुमारे 30 राउंड गोळीबार करण्यात आला. पोलिस घटनास्थळी पोहोचले मात्र त्यानंतर दोन्ही बाजूचे कोणीही तेथे उपस्थित नव्हते. गोळी लागलेल्यांपैकी एक मोहम्मद ताज असून त्याला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गुलशन कुमार यांचा मृत्यू झाला आहे.
सासाराममधील सफुलागंज येथे शनिवारी संध्याकाळी पुन्हा बॉम्ब फेकण्यात आले. यानंतर पोलिसांनी परिसरातील घरांमध्ये शोधमोहीम सुरू केली. यामध्ये आणखी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 25 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या सासाराममध्ये 5 आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दुसरीकडे, नालंदामध्ये कलम 144 लागू आहे. इंटरनेट बंद आहे. गया आणि भागलपूरमध्ये फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नालंदा, सासाराम आणि गया येथून आतापर्यंत 61 जणांना अटक करण्यात आली आहे.
रामनवमीच्या मिरवणुकीवरून बिहारमधील रोहतास, नालंदा, भागलपूर आणि गया या चार जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी हिंसक संघर्ष झाला. या घटनेनंतर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंगेरमध्ये मूर्ती विसर्जनाच्या वेळी हिंसाचार
मुंगेरमध्ये शनिवारी मूर्ती विसर्जनाच्या वेळी वाद झाला. दोन्ही पक्षांमध्ये दगडफेक आणि हाणामारी झाली. पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. दोन गावांतील तणाव पाहता एसडीएम, डीएसपीसह अनेक पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हे प्रकरण नयारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गधीरामपूर गावातील आहे.
मुख्यमंत्री म्हणाले - कठोर कारवाई करणार
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, रामनवमी शोभायात्रेदरम्यान घडलेली घटना दुःखद आहे. याची माहिती मिळताच आम्ही सतर्क झालो आणि वेगाने कारवाई केली आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कोणीतरी हे जाणूनबुजून केले आहे. या संदर्भात संपूर्ण चौकशी करावी, असे निर्देश दिले आहेत.
आता हिंदूंना बिहारमध्ये राहण्यासाठी जिझिया कर द्यावा लागेल, अन्यथा त्यांना स्थलांतर करावे लागेल, असे ट्विट केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे.
दोन पोलिस ठाण्यात 8 एफआयआर दाखल
बिहार शरीफमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात आठ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. लाहेरी पोलिस ठाण्यात सात आणि बिहार पोलिस ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लाहेरी पोलिस ठाण्यात पोलिसांनी दोन एफआयआर आणि लोकांकडून पाच एफआयआर दाखल केले आहेत. शनिवारी तणावग्रस्त भागात फ्लॅग मार्च काढण्यात आला. रविवारी कलम 144 हटवण्यात येणार आहे. इंटरनेट पूर्ववत करण्याचा निर्णयही रविवारीच घेतला जाणार आहे. याशिवाय सर्व वॉर्डात शांतता समितीची बैठक होणार आहे.
61 जणांना अटक
बिहारशरीफमध्ये दोन्ही बाजूंच्या हाणामारीत 6 जणांना गोळ्या लागल्या, तर दगडफेकीत 22 जण जखमी झाले. दगडफेकीनंतर येथील लोकांनी दुकानेही लुटली. नालंदामध्ये 27, रोहतासमध्ये 26 आणि गयामध्ये 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
बिहार शरीफमध्ये वाद वाढला
खरेतर, मिरवणुकीत सहभागी काही लोक नालंदा येथील बिहारशरीफ गगन दिवाण परिसरातील स्मशानभूमीवर चढू लागले. यादरम्यान एकीकडून शिवीगाळ सुरू झाली. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. सध्या आयुक्त रवी कुमार आणि आयजी राकेश राठी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. नालंदा आणि सासाराममध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
चोरट्यांनी दुकाने लुटली
बिहार शरीफमध्ये हाणामारीनंतर बदमाशांनी लूटही केली. नाला रोडवरील डिजिटल दुनिया नावाच्या इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरट्यांनी लूट केली, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दुकानातून 20 ते 30 जण इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पळून जात असल्याचे दिसून येत आहे.
बिहार शरीफ येथे झालेल्या हाणामारीत लोक जखमी
नालंदा येथील करण कुमार, छोटा नारायण, आकाश कुमार, गोलू कुमार (बिहारशरीफ), पियुष सिंग आणि गोलू कुमार (मोहद्दीपूर) हे जखमी झाले आहेत.
सासाराममध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
शुक्रवारी सासाराम येथील मिरवणुकीत दोन्ही बाजू समोरासमोर आल्या. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. इंटरनेट बंद करण्यात आले आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहााबादचे डीआयजी नवीनचंद्र झा म्हणाले की, परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.