आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Centre Govt Said If We Take Strong Measures, The Third Wave May Not Happen In All The Places

तिसरी लाट कशी टाळावी:कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने एक उपाय सांगितला, मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तिसरी लाट येण्याचीही चर्चा आहे. ही बाब केंद्र सरकारकडूनच आली आहे. तथापि, सरकारही यावर मत मांडण्यास असमर्थ आहे. दोन दिवसांपूर्वी तिसर्‍या लाटेचा इशारा देणारे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन शुक्रवारी पुन्हा मीडियासमोर आले. ते म्हणाले की, आपण कठोर उपाययोजना केल्या तर कदाचित काही ठिकाणीच करोनाची तिसरी लाट येईल, नाहीतर येणारही नाही.

राघवन पुढे म्हणाले की, स्थानिक पातळीवर, राज्यांत, जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे किती प्रभावीपणे लागू होतात यावर बरेच काही अवलंबून आहे. तथापि, विजयन यांनी त्यांच्याकडून कोणतेही उपाय सांगितले नाहीत. ते फक्त मार्गदर्शक तत्त्वांविषयीच बोलले.

बुधवारी राघवन म्हणाले होते की, कोरोनाची तिसरी लाटही येईल. विषाणूचा संसर्ग त्याच्या उच्च स्तरावर आहे. तिसरी लाट कधी येईल आणि किती धोकादायक आहे हे अद्याप ठरलेले नाही, परंतु नव्या लाटेसाठी आपण तयार राहिले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...