आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhattisgarh's First Kisan School Gets Patent For 36 Varieties Of Vegetables And Rice

शेतकऱ्यांचे मोठे यश:छत्तीसगडची पहिली किसान शाळा नावारूपास, भाजी अन् भाताच्या 36 वाणांचे मिळवले पेटंट

दीपक देवांगण | बिलासपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जांजगीर-चंपा जिल्ह्यातील बहेराडीह हे गाव देशातील पहिली शेतकरी शाळा म्हणून देशभरात नावारूपास आले आहे. विशेष बाब म्हणजे ही शाळा चालवणाऱ्या शेतकऱ्याने छत्तीसगडमधील भाजीपाला आणि धानाच्या ३६ वाणांचे पेटंट घेतले आहे. पेटंट झालेल्या भाजीपाला आणि भाताच्या सर्व जाती शाळेच्या छतावर कुंड्यांमध्ये लावल्या जात आहेत. यामध्ये चौलाई, आमरी, चेंच या भाज्यांचा समावेश आहे.

शाळेने आमरी, चेंच आणि केळीच्या सालीपासून बनवलेल्या धाग्यांपासून जॅकेट व राख्या बनवल्या आहेत. ‘भास्कर’ शाळेत पोहोचला तेव्हा शेतकरी दीनदयाळ यादव जवळच्या शेतकरी आणि महिला गटांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देत होते. त्यांनी सांगितले की, येथे बनवलेले सेंद्रिय खत केवळ भाजीपाला लागवडीतच फायदेशीर नाही, तर मूग, लिंबू, आंबा, पपई या पिकांसाठीही फायदेशीर आहे. सेंद्रिय खतांतून दुप्पट उत्पादन मिळते, असा दावा यादव यांनी केला. दीनदयाळ २०१०-११ पासून भाजीपाल्यांवर शोध लावत असले तरी २३ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी गावातच शेतकरी शाळा उघडली. २०२२ मध्ये या शाळेला जांजगीर परिसरातील पत्रकार कुंजबिहारी साहू यांचे नाव दिले.ऑस्ट्रेलियातून आणले गांडूळ: शेतकरी दीनदयाळ यांनी सांगितले की, २०१२ मध्ये कृषी विभागाकडून गांडूळ खत तयार करण्यासाठी अर्धा किलो ऑस्ट्रेलियन गांडूळ इसेनिया पोटिटा नमुना म्हणून देण्यात आले होते. यानंतर गांडुळांची निर्मिती करण्यात आली.

२०२१ ला किसान शाळेची स्थापना
२३ डिसेंबर २०२१ ला शेतकरी दिनानिमित्त जांजगीर जिल्ह्यातील बहेराडीह गावात शेतकरी शाळेची स्थापना करण्यात आली. कृषी विभागाच्या सहकार्याने पिके व भाजीपाला लागवडीसाठी येथे नवनवीन प्रयोग केले जातात.

बातम्या आणखी आहेत...